ETV Bharat / state

उस्मानाबादमध्ये जनावरांच्या चाऱ्याचे दर गगनाला भिडले

author img

By

Published : Nov 29, 2019, 12:02 PM IST

आज घडीलाही जिल्ह्यामध्ये २५ ते ३० रुपयाला पिवळ्या ज्वारीच्या कडब्याची एक पेंडी मिळत आहे. या दिवसांमध्ये सर्वत्र हिरवा चारा असतो. मात्र, जनावरांच्या चाऱ्याचे दर गगनाला भिडले आहेत. नोव्हेंबर महिन्यातच चाऱ्याचे दर वाढल्याने पुढील दोन तीन महिन्यात हेच दर ५० ते ६० रुपये प्रती पेंडी वाढण्याची शक्यता आहे.

rate of animal food increase at osmanabad
उस्मानाबादमध्ये जनावरांच्या चाऱ्याचे दर गगनाला भिडले

उस्मानाबाद - जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून चाऱ्याच्या एका पेंडीचा दर २५ ते ३० रुपये झाला आहे. त्यामुळे येत्या काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अजूनच बिकट होण्याची चिन्हे आहेत. राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटला होता. परंतु, चाऱ्याचा दर वाढल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.

उस्मानाबादमध्ये जनावरांच्या चाऱ्याचे दर गगनाला भिडले

हेही वाचा - 'महा'शपथविधी संपन्न.. उद्धव ठाकरे मुख्यमंंत्री, नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा

परतीच्या पावसामुळे रब्बीची पेरणी व्यवस्थित होऊ शकली नाही. अजूनही काही भागातील शेतांमधील वापसा झाला नसल्याने पेरणी खोळंबली आहे. तर जिराईत भागात भरपूर पाणी नसल्यामुळे पेरणी होऊ शकली नाही. त्यामुळे भविष्यातील चाराटंचाई वाढणार आहे. गेली वर्षभर जिल्ह्यामध्ये चारा छावण्या सुरू होत्या. परतीचा पाऊस झाल्याने जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटला होता. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी सुरू असलेल्या १०० हून अधिक चारा छावण्या बंद करण्यात आल्या. मात्र, आता लवकरच शासनाला चारा छावण्या सुरू कराव्या लागतील, असे चित्र जिल्ह्यात आहे.

आज घडीलाही जिल्ह्यामध्ये २५ ते ३० रुपयाला पिवळ्या ज्वारीच्या कडब्याची एक पेंडी मिळत आहे. या दिवसांमध्ये सर्वत्र हिरवा चारा असतो. मात्र, जनावरांच्या चाऱ्याचे दर गगनाला भिडले आहेत. नोव्हेंबर महिन्यातच चाऱ्याचे दर वाढल्याने पुढील दोन तीन महिन्यात हेच दर ५० ते ६० रुपये प्रती पेंडी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आत्ताच जमेल तसा चारा साठवून ठेवावा लागणार आहे.

Intro:जनावरांच्या चाऱ्याचे भाव आत्ताच गगनाला भिडलेली;भविष्यात आणखी चार टंचाई भासण्याची शक्यता



उस्मानाबाद- गेली वर्षभर जिल्ह्यामध्ये चारा छावण्या सुरू होत्या, परतीचा पाऊस सुरू झाला आणि जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न काहीप्रमाणात मिटला त्यामुळे अवघ्या महिनाभरापूर्वी सुरू असलेल्या 100 हुन अधिक चारा छावण्या बंद करण्यात आल्या मात्र आता लवकरच शासनाला तत्परता दाखवत चारा छावण्या सुरू कराव्या लागतील असं चित्र जिल्ह्यात आहे आज घडीलाही जिल्ह्यामध्ये पंचवीस रुपयाला एक पिवळ्याची पिंडी विकत मिळते या दिवसांमध्ये सर्वत्र हिरवा चारा असतो मात्र तरी जनावरांच्या चाऱ्याचा भाव गगनाला भिडलेले आहेत त्याचबरोबर ज्वारीच्या चार्‍याची पिंडीचा भाव 30 रुपये ते 35 रुपये पिंडी प्रमाणे आहे नोव्हेंबर महिन्यातच चाऱ्याचे चे भाव वाढलेले पाहायला मिळतात तर पुढल्या दोन-तीन महिन्यात हेच भाव पन्नास ते साठ रुपयेला पिंडी अशाप्रमाणे ज्वारीच्या जनावरांच्या चाऱ्याची किम्मत वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आत्ताच जमेल तसा चारा साठवून ठेवावा लागणार आहे यावर्षी परतीच्या पावसामुळे रब्बीची पेरणी व्यवस्थित होऊ शकली नाही अजूनही काही ठिकाणी रानाचा वापसा झाला नसल्याने पेरणी खोळंबली आहे तर जिराईत असलेल्या रानामध्ये भरपूर पाणी नसल्यामुळे ही पेरणी होऊ शकली नाही त्यामुळे भविष्यातील चाराटंचाई वाढणार आहे


Body:हे एडिट करून पाठवत आहे

byte -विठ्ठल गायकवाड


Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.