ETV Bharat / state

Maharashtra Water Scarcity : नाशिकच्या येवला तालुक्यात 7 टँकरद्वारे भागवली जाते आहे १५ गावांची तहान

author img

By

Published : Apr 27, 2022, 5:33 PM IST

दुष्काळी येवला तालुक्यात यंदा जोरदार पाऊस होऊनही तालुक्यात पाणी टंचाईची ( Water Scarcity In Yeola ) तीव्रता वाढत आहे. सद्यस्थितीत 13 गावाची तहान 7 टँकरद्वारे 18 खेपाद्वारे ( Water Tanker Provide To Yeola Village ) रोज भागवली जात आहे.

Maharashtra Water Scarcity
Maharashtra Water Scarcity

येवला ( नाशिक) - दुष्काळी येवला तालुक्यात यंदा जोरदार पाऊस होऊनही तालुक्यात पाणी टंचाईची ( Water Shortage In Yeola ) तीव्रता वाढत आहे. सद्यस्थितीत 13 गावाची तहान 7 टँकरद्वारे 18 खेपाद्वारे रोज भागवली जात असून ( Water Tanker Provide To Yeola Village ) १४ वाडे आणि २ गावांच्या टँकरचे प्रस्ताव अजूनही प्रलंबित असल्याची माहिती गटविकास अधिकारी यांनी दिली आहे.

7 टँकरद्वारे पाणीपुरवठा - येवला तालुक्याच्या पूर्व भागामध्ये टँकरची मागणी असते. जानेवारीपासूनच ही मागणी सुरू होते. मात्र, यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून पाण्याच्या टँकरची मागणी आजच्या घडीला 13 गावे व दोन वाड्या अशा 15 गावांसाठी 7 टँकरद्वारे 18 खेपा करून पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया

अजून पाणी मिळावे मागणी - भुलेगाव येथे पाण्याचे टँकर येताच लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वच जण पाणी भरण्यासाठी धावपळ करत असतात. मात्र ते अत्यल्प प्रमाणात पाणी येत असल्याने प्रत्येक जण या ठिकाणी पाण्याची टाकी लावत असल्याने काहींना पाणी मिळते, तर काहींना कमी मिळते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे जास्तीचे पाणी मिळावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहे.

हेही वाचा - Fuel Price Crisis : इंधन दरावरून राज्य आणि केंद्र आमने-सामने; केंद्राकडून राज्याला सापत्न वागणूक - मुख्यमंत्री ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.