ETV Bharat / state

नदीपार करण्यासाठी गावकऱ्यांची कसरत; पूल बांधण्याची मागणी

author img

By

Published : Oct 2, 2021, 12:58 PM IST

गेल्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे येवला तालुक्यातील मातुलठाण येथील कातुरे वस्तीतील नारंदी नदीला पूर आला होता. त्यामुळे तेथील नागरिकांना ये - जा करण्यासाठी दोरीच्या सहाय्याने नदी पार करण्याची वेळ येत आहे.

difficulties for crossing the
पूल बांधून देण्याची मागणी

येवला (नाशिक) - येवला तालुक्यातील मातुलठाण येथिल कातुरे वस्तीवरील नागरिकांना नदीपार करण्याकरता जीवघेणी कसरत करावी लागत आहे. नदीला पाणी असल्याने दोरीच्या सहाय्याने नदी पार करण्याची वेळ तेथील कुटुंबांवर आली आहे.

पूल बांधून देण्याची मागणी
दोरीच्या सहाय्याने नदी पार
गेल्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे येवला तालुक्यातील मातुलठाण येथील कातुरे वस्तीतील नारंदी नदीला पूर आला होता. त्यामुळे तेथील नागरिकांना ये - जा करण्यासाठी दोरीच्या सहाय्याने नदी पार करण्याची वेळ येत आहे. या ठिकाणी नागरिक पूल बांधण्याची मागणी करत आहेत. या नदीच्या जवळपास 25 कुटुंब राहत आहे. नागरिक आपला जीव धोक्यात टाकून कसरत करत होते.
पूल बांधून देण्याची मागणी

वारंवार पूल बांधून देण्याची मागणी करूनही संबंधित विभाग दुर्लक्ष करत आहे. नदीला गेल्या चार दिवसापासून पूर आल्याने कोणत्या प्रकारचे वाहन घेऊन जाता येत नाही. परिणामी शेतमालाची विक्री करता येतही नाही. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे.

हेही वाचा - महात्मा गांधी जयंती 2021 : सोनिया गांधी, मोदी, केजरीवालांकडून गांधीजींना राज घाटावर आदरांजली अर्पण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.