ETV Bharat / state

आयात उमेदवारांवर मतदार विश्वास ठेवणार नाही - जे.पी गावित

author img

By

Published : Apr 5, 2019, 10:49 PM IST

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात माकपकडून आज माकपचे आमदार जे.पी गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांनी अर्ज दाखल केला. दिंडोरीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांना संधी दिली असून मतदार कधीच त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, अशी टीका त्यांनी केली.

आमदार जे.पी गावित

नाशिक - दिंडोरी लोकसभा मतदारसंघात माकपकडून आज माकपचे आमदार जे.पी गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांनी अर्ज दाखल केला. दिंडोरीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांना संधी दिली असून मतदार कधीच त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, अशी टीका त्यांनी केली.

माकपचे आमदार जे.पी गावित

दिंडोरीतून भाजपकडून भारती पवार तर राष्ट्रवादीकडून धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आली असून या मतदारसंघात तिहेरी लढत बघायला मिळणार आहे. हरिश्चंद्र चव्हाण यांचे तिकीट कापून भाजपने त्यांच्यावर अन्याय केल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. हरिश्चंद्र चव्हाण व आमची भेट झाली असून आम्ही उमेदवारीसाठी कुठलाही निर्णय घेतला नाही.

लोकांची कामे केली असून लोक मला लोकसभेत पाठवतील, अशी खात्री आहे. शेतकऱ्यांची मुख्य कामे बाकी आहेत ती पूर्ण करण्यासाठी मी लोकसभेत जाईन, विधानसभेत आत्तापर्यंत मी नऊ वेळा निवडणूक लढलो व सात वेळा जिंकलो. सध्याच्या काळात लोकांसाठी मोठ्या प्रमाणात काम केले असून दिंडोरी मतदारसंघातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मी आग्रही राहिन, असेही ते म्हणाले.

Intro:दिंडोरी लोकसभेसाठी माकप कडून आज माकपचे आमदार जे पी गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला दुपारी आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांनी अर्ज दाखल केला दिंडोरी मध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांना संधी दिली असून मतदार कधीच त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही अशी त्यांनी टीका केली


Body:दिंडोरीतून भाजपकडून भारती पवार तर राष्ट्रवादीकडून धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आली असून दिडोरी मतदार संघात तिहेरी लढत इथे बघायला मिळणार आहे हरिश्चंद्र चव्हाण यांचे तिकीट कापून भाजपाने त्यांच्यावर अन्याय केल्याचेही त्यांनी बोलून दाखवले हरिश्चंद्र चव्हाण व आमची भेट झाली असून आम्ही उमेदवारीसाठी कुठलाही निर्णय घेतला नाही


Conclusion:लोकांची मी काम केली असून लोक मला लोकसभेत पाठवतील अशी मला खात्री आहे शेतकऱ्यांचे मुख्य काम बाकी आहेत ती पूर्ण करण्यासाठी मी लोकसभेत जाईल विधानसभेत आत्तापर्यंत मी नऊ वेळा निवडणूक लढलो व सात वेळा जिकलो सध्याच्या काळात लोकांनी मोठ्या प्रमाणात काम केले असून दिंडोरी मतदारसंघातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मी आग्रही राहिल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.