ETV Bharat / state

नंदुरबार जिल्हा पावसाच्या प्रतीक्षेत; खरीप हंगामात 58 टक्के पेरण्या पूर्ण

author img

By

Published : Jul 12, 2019, 3:24 PM IST

पावसाच्या प्रतिक्षेत 58 टक्के पेरण्या पू्र्ण

जिल्ह्यातील प्रमुख पिकांमधील कापसाचे क्षेत्र एकूण १ लाख ६ हजार ९० हेक्टर एवढे आहे. त्यापैकी ७७ हजार ८०७ हेक्‍टरवर आतापर्यंत कापूस लागवड पूर्ण झाली आहे.

नंदुरबार - जिल्ह्यात जून महिन्यामध्ये अपेक्षेसारखा पाऊस झाला नाही. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. मात्र, अजून पेरणी लायक समाधानकारक पाऊस झालेला नाही. तरीही झालेल्या पावसावर बळीराजाने ५८ टक्के पेरण्या उरकल्या असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

नंदुरबार पावसाच्या प्रतीक्षेत...! खरीप हंगामात 58 टक्के पेरण्या पूर्ण

जिल्ह्यातील प्रमुख पिकांमधील कापसाचे क्षेत्र एकूण १ लाख ६ हजार ९० हेक्टर एवढे आहे. त्यापैकी ७७ हजार ८०७ हेक्‍टरवर आतापर्यंत कापूस लागवड पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात अक्कलकुवा, धडगाव आणि नवापूर या तालुक्यांमध्ये खरीप हंगामात प्रामुख्याने ज्वारीचे पीक घेतले जाते. जिल्ह्यात ज्वारी पिकाचे एकूण क्षेत्र ३० हजार १२६ हेक्टर आहे. त्यापैकी १७ हजार ४२८ हेक्टरवर ज्वारी पिकाची पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात मका पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३१ हजार ९२८ हेक्टर आहे. त्यापैकी १८ हजार १९३ हेक्‍टरवर मक्याची लागवड पूर्ण झाली आहे.

शेतकऱ्यांचा कल नगदी पिके घेण्याकडे वाढत आहेत. मात्र, यामुळे अन्नधान्याच्या पिकांमध्ये घट होत आहे. जिल्ह्यातील बाजरी हे प्रमुख पीक होते. मात्र, दिवसेंदिवस बाजरी पिकाचे क्षेत्र कमी होत चालले आहे. तसेच उडीद, मूग, तूर, भुईमूग, भात या पिकांचेही क्षेत्र कमी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. बाजरी पिकाला केंद्र शासनाने न्यूट्रिशनमध्ये समाविष्ट केल्याने तृणधान्ये आणि कडधान्ये यांवर शेतकऱ्यांनी भर द्यावा असे आव्हान कृषी विभागाने केले आहे.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पेरणीसाठी समाधानकारक असा पाऊस झालेला नाही. सरासरीपेक्षा फक्त १९ टक्केच पाऊस आतापर्यंत झाला आहे. मात्र, तरीही बळीराजाने कमी पावसाच्या भरवशावर पेरण्या उरकल्या आहेत. कमी दिवसात आणि कमी पाण्यात उत्पन्न देणाऱ्या पिकांवर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.

Intro:

Note :- या बातमीचा पॅकेज एडिट करून पाठवत आहे


पावसाचा जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली खरी परंतु पेरणी लायक समाधानकारक पाऊस झालेला नाही. तरीही झालेल्या पावसावर बळीराजाने 58 टक्के पेरण्या उरकल्या असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

Byte :- बी.एन.पाटील - जिल्हा कृषी अधिकारी नंदुरबार,
Body:जिल्ह्यातील प्रमुख पिकांमधील कापसाचे क्षेत्र एकूण १ लाख ६ हजार ९० हेक्टर एवढ आहे त्यापैकी ७७ हजार ८०७ हेक्‍टरवर आतापर्यंत कापूस लागवड पूर्ण झालेली आहे, तर जिल्ह्यातील प्रामुख्याने आदिवासी पट्ट्यात अक्कलकुवा, धडगाव आणि नवापूर या तालुक्यांमध्ये खरीप ज्वारीचे पीक घेतले जाते, खरीप ज्वारीचे एकूण क्षेत्र ३० हजार १२६ हेक्टर आहे, त्यापैकी १७ हजार ४२८ हेक्टरवर ज्वारी पिकाची पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात मका पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३१ हजार ९२८ हेक्टर आहे, त्यापैकी १८ हजार १९३ हेक्‍टरवर मक्याची लागवड पूर्ण झालेली आहे.

Byte :- बी.एन.पाटील - जिल्हा कृषी अधिकारी नंदुरबार,

शेतकऱ्यांचा कल नगदी पिके घेण्याकडे वाढ होत असून अन्नधान्याच्या पिकांमध्ये घट होताना दिसून येत आहे, जिल्ह्यातील बाजरी हे प्रमुख पीकामधील होतं परंतु दिवसेंदिवस बाजरी पिकाचे क्षेत्र कमी होत चालल आहे, तसेच उडीद, मूग, तूर, भुईमूग, भात या पिकांचे क्षेत्र कमी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे, बाजरी पिकाला केंद्र शासनाने न्यूट्रिशन मध्ये समाविष्ट केल्याने तृणधान्ये आणि कडधान्ये यांवर शेतकऱ्यांनी भर द्यावा असे आव्हान कृषी विभागाने केले आहे.

Byte :- बी.एन.पाटील - जिल्हा कृषी अधिकारी नंदुरबार,
Conclusion:जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पेरणीसाठी समाधानकारक असा पाऊस झालेला नाही, कमी पावसाच्या भरोशावर पेरण्या उरकल्या आहेत, जिल्ह्यात सरासरीपेक्षा फक्त 19 टक्केच पाऊस आतापर्यंत झाला आहे. कमी दिवसात आणि कमी पाण्यात उत्पन्न देणाऱ्या पिकांवर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे असा सल्ला कृषी विभाग तर्फे शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.