ETV Bharat / state

नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; केळी बागांचे मोठे नुकसान

author img

By

Published : May 31, 2021, 6:28 PM IST

Updated : May 31, 2021, 7:25 PM IST

नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. घरावरील पत्रे उडून परिसरातील केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पिकाचे अतोनात नुकसान केले आहे. अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागेचे मोठे नुकसान झाले.

नांदेड पाऊस
नांदेड पाऊस

नांदेड - वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसाने नांदुसा गावाच्या शिवारात प्रचंड नुकसान झाले आहे. नांदुसा शिवारातील केळी, ऊस आणि इतर फळबाग वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडले आहेत. गावातील अनेक घरांचे पत्रे उडून घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यामुळे नांदुसा, कामठा गावातील अनेक संसार उघड्यावर आले आहेत. अचानक आलेल्या या वादळामुळे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
शेतकऱ्यांनाही फटका

नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. घरावरील पत्रे उडून परिसरातील केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पिकाचे अतोनात नुकसान केले आहे. अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागेचे मोठे नुकसान झाले. यात शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.


खरीपाचे बियाणे अन् खतही भिजले

अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेतात काम सुरू असलेल्या मजुरांची धावपळ झाली. तसेच शेतातील आखाडे पूर्णतः उध्वस्त झाले असून शेतीमधील मोठे झाडे कोसळली आहे. लॉकडाऊनमुळे आधीच केळीला कवडीमोल भाव मिळत आहे, त्यात तापमानाचा फटका बसला. आता वादळी वाऱ्यामुळे केळीचे झाडे आडवी झाली आहेत. तसेच शेतातील घरावरील पत्रे उडल्यामुळे शेतात आणून ठेवलेले खत व बियाणे यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा -राज्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला, असे असतील पॉझिटीव्हीटी रेटनुसार नवीन नियम

Last Updated : May 31, 2021, 7:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.