ETV Bharat / state

10th 12th Exam News: दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परिक्षेत मोठा बदल, सुरुवातीऐवजी शेवटचे दहा मिनिटे अतिरिक्त मिळणार

author img

By

Published : Feb 16, 2023, 7:08 AM IST

गेल्या अनेक वर्ष राज्यामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेमध्ये परीक्षेच्या आधी दहा मिनिटे प्रश्नपत्रिका दिल्या जायच्या. मात्र शासनाने कॉपी हा प्रकार बंद करण्यासाठी परीक्षेच्या आधी दहा मिनिटे मिळणारे पेपर देण्याचा निर्णय रद्द केला. मात्र शिक्षक पालक आणि मुख्याध्यापक या सर्वांनी दहा मिनिटे सुरुवातीला किंवा नंतर वाढवून द्यावे, ही मागणी केल्यामुळे परीक्षा मंडळाने तसा निर्णय घेतला आहे. आता सुरुवातीऐवजी परीक्षा संपते तेव्हा 10 मिनिटे वेळ वाढवून दिली आहे.

Maharashtra Board of Secondary and Higher Secondary Education
महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

मुंबई : महाराष्ट्रातील आतापर्यंत दहावी आणि बारावीच्या परीक्षा मंडळ स्थापनेपासून या परीक्षेमध्ये प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी परीक्षा घालण्यात पूर्वी दहा मिनिटे आधी दिले जात होते. त्यामुळे परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वीचे हे दहा मिनिटे विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकेसाठीचे नियोजन करण्यास सुलभ होत होते. प्रश्नपत्रिका निरीक्षण, आकलन आणि मग नियोजन त्यामुळे करता येत होते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रांवर परीक्षेच्या आधी जर प्रश्नपत्रिका वाटप केली. तर तेवढ्या दहा मिनिटांच्या कालावधीत त्या प्रश्नपत्रिका फुटत असे. परीक्षेबाहेरच्या वर्तुळामध्ये ती जात असे, त्याच्यावर उत्तरे लिहून कॉपी करण्याचा प्रकार सर्रास महाराष्ट्रामध्ये होत असे, याला आळा घालण्यासाठी शासनाच्या सूचनानुसार परीक्षा मंडळाने परीक्षेच्या आधी दहा मिनिटे देण्याचे निर्णय रद्द केला.


विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण टप्पा : वास्तविक इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा ह्या विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. त्यामध्ये पालक व समाज घटक मुख्याध्यापक शिक्षक यांचे सगळ्यांचे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर व तसेच अन्य समाज माध्यमांतून प्रसारित केल्या जायच्या. त्यामध्ये अफवा असायच्या. या घटना शासनाच्या लक्षात आल्या, त्यामुळे शासनाने काही कठोर पावले उचलण्याचे निर्णय घेतले.



कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत परीक्षा : या प्रकारच्या कॉपी करण्याच्या घटनांना प्रतिबंध व्हावा, म्हणून परीक्षा निकोप व्हायला पाहिजे. त्यात भीती नसावी आणि कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत परीक्षा पार पडावी. यासाठी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी मार्च 2023 पासून रद्द करण्यात असल्याचे परीक्षा मंडळाने कळवले होते. मात्र राज्यातील तमाम विद्यार्थी पालक आणि शिक्षक मुख्याध्यापक सर्वांनी विद्यार्थ्यांना दहा मिनिटे सदरची वाढून देण्यात यावी किंवा सुरुवातीला दहा मिनिटे वाढून दिले जावे; अशी मागणी एकमुखाने केली होती. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने सुरुवातीऐवजी नंतरच्या शेवटच्या काळातील दहा मिनिटे वाढवून दिलेली आहेत.



परीक्षा केंद्रावर उपस्थित : त्यामुळे परीक्षा मंडळाने जो निर्णय घेतला आहे. त्यामध्ये नमूद केलेले आहे की, फेब्रुवारी मार्च 2023 या परीक्षेपासून सकाळ सत्रात सकाळी 11 वाजता आणि दुपार सतरा दुपारी तीन वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात येईल. तसेच लेखनाला प्रारंभ केला जाईल. सकाळ सत्रात साडेदहा वाजता, तसेच दुपार सत्रात अडीच वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.


वेळ वाढवून दिलेला आहे 'तो' असा : परीक्षेची आधीची वेळ सकाळ सत्रात अकरा वाजता सुरू होईल, ते दुपारी दोन वाजेपर्यंत होती. परीक्षेची सुधारित वेळ आता अकरा वाजता सुरू होऊन दुपारी दोन वाजून दहा मिनिटापर्यंत असेल. त्यामुळे शेवटच्या सत्रामध्ये दहा मिनिटे वाढवून दिले गेले आहेत. आता विद्यार्थ्यांना सुरुवातीऐवजी पेपर संपताना शेवटचे दहा मिनिटे अतिरिक्त मिळणार आहे, अशी माहिती परीक्षा मंडळ सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.

हेही वाचा : Today Horoscope : 'या' राशींच्या लोकांच्या हातून परोपकाराचे कार्य घडतील, कुलदेवतेचा पाठ करावा, वाचा, आजचे राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.