ETV Bharat / state

Assaulting Best Driver : बेस्ट चालकासोबत झालेल्या मारहाणीत दोन्ही आरोपींची निर्दोष सुटका

author img

By

Published : Dec 30, 2022, 8:12 PM IST

बेस्ट चालकाला मारहाण ( Beating the best driver ) केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींची मुंबई सत्र न्यायालयाने ( Bombay Sessions Court ) निर्दोष मुक्तता केली आहे. ही कुलाबा परिसरात 2008 मध्ये घडली ( Assaulting Best Driver ) होती.

Bombay Sessions Court
मुंबई सत्र न्यायालय

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या ( Mumbai Municipal Corporation ) बेस्ट चालकासोबत कुलाबा परिसरात 2008 मध्ये झालेल्या वादातून दोन आरोपींची मुंबई सत्र न्यायालयाने ( Bombay Sessions Court ) निर्दोष सुटका केली आहे. या प्रकरणात आरोपींनी बस चालकाला विरोधात केलेले अपशब्द फिर्यादी बस चालक, कंडक्टरला आठवत नसल्याचे निरीक्षण नोंदवत दोन्हीही आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. कुलाबा परिसरामध्ये एप्रिल 2008 मध्ये कुलाबा डेपोतून आगरकर चौकाकडे जात असताना बेस्ट बस चालकाने घडली ( Assaulting Best Driver ) होती.

आरोपींची निर्दोष सुटका - मुंबई सत्र न्यायालयाने बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट बेस्ट बस चालकाचा हेतुपुरस्सर अपमान केल्याचा आरोप असलेल्या दोन व्यक्तींची निर्दोष मुक्तता केली आहे. कारण तक्रारदारांना आरोपीने त्याचा अपमान करण्यासाठी वापरलेले चुकीचे अपमानास्पद शब्द आठवत नसल्याने आरोपी हार्दिक व्यास, शैलेश शहा या दोघांचीही निर्दोष सुटका करण्यात आली आहे. या दोन्ही विरोधात कुलाबा पोलिसांनी आयपीसी कलम 353, 332, 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या सर्व आरोपातून अतिरिक्त सत्र न्यायाधीश दत्ता ढोबळे यांनी दोन्हीही आरोपींना निर्दोष सुटका केली आहे.

बस चालकाला मारहाण - बस स्टॉपवर, ऑटोरिक्षात बसलेल्या दोन व्यक्तींनी वाहन रोखून बस नीट चालवली नसल्याचा आरोप करत चालकाला मारहाण केली होती. पोलिस त्याच्या बचावासाठी येण्यापूर्वी त्यांनी त्याच्यावर शिवीगाळही केली, असे फिर्यादीने तक्रारीत म्हटले होते. खटल्याच्या उलट तपासणी दरम्यान फिर्यादी पक्षाने बस चालक, कंडक्टरसह सहा साक्षीदार तपासले आहे.


आरोप सिद्ध करण्यात अयशस्वी- खटल्यात, ड्रायव्हर, कंडक्टरने त्यांच्या साक्षीत सांगितले की आरोपींनी नेमके कोणते अपमानास्पद शब्द वापरले हे त्यांना आठवत नाही. त्यामुळे आरोपीने जाणूनबुजून पीडितेचा अपमान केल्याचा कोणताही पुरावा नाही. जो आयपीसीच्या कलम 504 च्या गुन्ह्याचा मुख्य घटक आहे असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. कोर्टाने म्हटले की फिर्यादी पक्ष वाजवी संशयापलीकडे आरोपीविरुद्ध आयपीसीच्या कलम 353, 332, 504 अंतर्गत दंडनीय गुन्ह्यांचे आरोप सिद्ध करण्यात अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे असे न्यायालयाने आदेश दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.