ETV Bharat / state

Mumbai Railway: पाकिटमारांचा त्रास ते दिव्यांगाच्या अडचणी, केंद्रीय अर्थसंकल्पाकडून रेल्वे प्रवाशांच्या काय आहेत अपेक्षा?

author img

By

Published : Jan 29, 2023, 9:23 AM IST

Updated : Jan 29, 2023, 9:48 AM IST

मुंबईच्या लोकल रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी रोज आपण पाहतो. मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मिळून 70 लाखाxपेक्षा अधिक प्रवासी रोज रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे महामंडळाला यामधून मोठा महसूल प्राप्त होतो. आता येणाऱ्या दोन दिवसानंतर अर्थसंकल्पात मुंबईच्या रेल्वेसाठी काय असले पाहिजे याबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत. अर्थसंकल्पामध्ये रेल्वे प्रवाशांच्या अपेक्षा सविस्तरपणे पाहू या.

Mumbai Railway
अर्थसंकल्पामध्ये रेल्वे प्रवाशांच्या अपेक्षा
अर्थसंकल्पामध्ये रेल्वे प्रवाशांच्या अपेक्षा

मुंबई: लोकल रेल्वेच्या फेऱ्या आणि संख्या दोन्ही वाढवले पाहिजे. मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर डहाणूपासून तर चर्चगेटपर्यंत रोज तीस लाख लोक ये-जा करतात. तर मध्य रेल्वेमध्ये कर्जत, कसारा टिटवाळा ते बदलापूरपासून छत्रपती शिवाजी टर्मिनस, तर हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते छत्रपती शिवाजी टर्मिनस या मार्गावर 40 लाखापेक्षा अधिक प्रवासी रोज प्रवास करतात. एकूण मुंबई उपनगर रेल्वेमध्ये जवळजवळ 70 लाखापेक्षा अधिक प्रवासी रोज प्रवासी करतात. काही सुधार होत असला तरी मात्र त्यांच्या समस्या अद्यापही तशाच आहेत.

अतिरिक्त पलाट वाढवले पाहिजे: विशेष करून कल्याण येथे लोकल रेल्वे किंवा मेल एक्सप्रेस आल्यावर पुण्याहून येणारी आणि नाशिकहून येणारी कोणतीही ट्रेन आली, तर तिला क्रॉस करून यावे लागते. त्याचे कारण डाव्या बाजूने आलेल्या आणि उजव्या बाजूने आलेल्या दोन्ही रेल्वे मार्गावर तातडीने त्यांना पुढे सरळ ठाणे दिशेने जाण्यासाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग नाही. त्यामुळे हे क्रॉस करावे लागते. यामध्ये प्रचंड वेळ जातो. त्याचा परिणाम होतो की, लोकल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी उसळते. लोकल नियमित धावत नाही. पंधरा ते वीस मिनिटे दर दिवशी उशिराने धावत असतात.



रेल्वेमध्ये सुरक्षा देखील वाढवा: त्यामुळे रेल्वे प्रवासी जे आहेत, त्यांना लोकलची संख्या अधिक असावी, असे वाटते. या संदर्भात महाविद्यालयाचे विद्यार्थी सोहेल आणि रजत यांच्यासोबत ईटीव्ही भारतवतीने संवाद साधला असता त्यांनी सांगितले, की रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी असते. जर रेल्वेची संख्या वाढवली, तर मला वाटते यामध्ये थोडा फरक पडेल असे त्यांनी सांगितले. सुमित कुमार या रेल्वे प्रवासी यांनी सांगितले की, रेल्वेमध्ये पाकीटमार चोर मंडळींची संख्या देखील वाढलेली आहे. त्याच्यामुळे सुरक्षेसंदर्भात देखील रेल्वेने आता अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद करायला पाहिजे.



महिलांसाठी अतिरिक्त संख्येने विशेष ट्रेन: ह्या संदर्भात कुमुदिनि पाटील महिला प्रवासी यांनी सांगितले की, महिलांसाठी अतिरिक्त संख्येने विशेष ट्रेन असल्या पाहिजे. सर्वसाधारण ट्रेनमध्ये महिलांसाठी जास्त डबे देखील जोडले पाहिजे. तसेच रेल्वे स्थानकावर महिलांसाठी प्रसाधनगृहाची सोय असली पाहिजे. त्यामध्ये वाजवी फी आकारली पाहिजे. मात्र अनेकदा मोफत असताना देखील पैसे आकारले जातात, यावर रेल्वे महामंडळाने लक्ष दिले पाहिजे.


इमर्जन्सी मेडिकल सेंटर: तर रेल्वे प्रवासी संघटनेचे अमोल कदम यांनी सांगितले की, आपण पाहिले तर प्रत्येक रेल्वे स्थानकामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता आहे. इमर्जन्सी मेडिकल सेंटर रात्र पाळीमध्ये चालू राहिले पाहिजे. तेथे डॉक्टर वेळेवर नियमित हजर असले पाहिजे. त्याशिवाय सर्व पलाठ्यांवर प्रसाधन गृहांची सोय 24 तास असली पाहिजे. तसेच लोकलच्या संख्या आणि फेरी या देखील अधिक झाल्या पाहिजे.



दिव्यांग्यांसाठी स्वतंत्र ट्रेन: दिव्यांग प्रवासी संघटनेचे श्रीराम पाटणकर सातत्याने रेल्वे महामंडळाकडे पाठपुरा करीत लढा देतात. त्यांनी सांगितले की, दिव्यांगांच्या डब्यामध्ये सर्वसाधारण माणसे चढतात, तर कधी नजर चुकवून चढतात; तर कधी जाणून बुजून चढतात त्याचे कारण प्रचंड गर्दी असते. मात्र याबाबत रेल्वेने आता सर्वसाधारण डब्याच्या सोबत अधिकचे चार-पाच डबे दिव्यांगांसाठी जोडले पाहिजे. कारण त्यांची देखील संख्या वाढलेली आहे. तसेच दिव्यांग्यांसाठी स्वतंत्र ट्रेन देखील चालवल्या पाहिजे, म्हणजे समान संधीचा अवसर त्यांना रेल्वे प्रवास करताना प्राप्त होईल.

हेही वाचा: Sakal Hindu Samaj Morcha: दादर येथे आज सकल हिंदू समाज मोर्चा; 'हे' आहेत वाहतुकीत बदल

अर्थसंकल्पामध्ये रेल्वे प्रवाशांच्या अपेक्षा

मुंबई: लोकल रेल्वेच्या फेऱ्या आणि संख्या दोन्ही वाढवले पाहिजे. मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर डहाणूपासून तर चर्चगेटपर्यंत रोज तीस लाख लोक ये-जा करतात. तर मध्य रेल्वेमध्ये कर्जत, कसारा टिटवाळा ते बदलापूरपासून छत्रपती शिवाजी टर्मिनस, तर हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते छत्रपती शिवाजी टर्मिनस या मार्गावर 40 लाखापेक्षा अधिक प्रवासी रोज प्रवास करतात. एकूण मुंबई उपनगर रेल्वेमध्ये जवळजवळ 70 लाखापेक्षा अधिक प्रवासी रोज प्रवासी करतात. काही सुधार होत असला तरी मात्र त्यांच्या समस्या अद्यापही तशाच आहेत.

अतिरिक्त पलाट वाढवले पाहिजे: विशेष करून कल्याण येथे लोकल रेल्वे किंवा मेल एक्सप्रेस आल्यावर पुण्याहून येणारी आणि नाशिकहून येणारी कोणतीही ट्रेन आली, तर तिला क्रॉस करून यावे लागते. त्याचे कारण डाव्या बाजूने आलेल्या आणि उजव्या बाजूने आलेल्या दोन्ही रेल्वे मार्गावर तातडीने त्यांना पुढे सरळ ठाणे दिशेने जाण्यासाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग नाही. त्यामुळे हे क्रॉस करावे लागते. यामध्ये प्रचंड वेळ जातो. त्याचा परिणाम होतो की, लोकल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी उसळते. लोकल नियमित धावत नाही. पंधरा ते वीस मिनिटे दर दिवशी उशिराने धावत असतात.



रेल्वेमध्ये सुरक्षा देखील वाढवा: त्यामुळे रेल्वे प्रवासी जे आहेत, त्यांना लोकलची संख्या अधिक असावी, असे वाटते. या संदर्भात महाविद्यालयाचे विद्यार्थी सोहेल आणि रजत यांच्यासोबत ईटीव्ही भारतवतीने संवाद साधला असता त्यांनी सांगितले, की रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी असते. जर रेल्वेची संख्या वाढवली, तर मला वाटते यामध्ये थोडा फरक पडेल असे त्यांनी सांगितले. सुमित कुमार या रेल्वे प्रवासी यांनी सांगितले की, रेल्वेमध्ये पाकीटमार चोर मंडळींची संख्या देखील वाढलेली आहे. त्याच्यामुळे सुरक्षेसंदर्भात देखील रेल्वेने आता अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद करायला पाहिजे.



महिलांसाठी अतिरिक्त संख्येने विशेष ट्रेन: ह्या संदर्भात कुमुदिनि पाटील महिला प्रवासी यांनी सांगितले की, महिलांसाठी अतिरिक्त संख्येने विशेष ट्रेन असल्या पाहिजे. सर्वसाधारण ट्रेनमध्ये महिलांसाठी जास्त डबे देखील जोडले पाहिजे. तसेच रेल्वे स्थानकावर महिलांसाठी प्रसाधनगृहाची सोय असली पाहिजे. त्यामध्ये वाजवी फी आकारली पाहिजे. मात्र अनेकदा मोफत असताना देखील पैसे आकारले जातात, यावर रेल्वे महामंडळाने लक्ष दिले पाहिजे.


इमर्जन्सी मेडिकल सेंटर: तर रेल्वे प्रवासी संघटनेचे अमोल कदम यांनी सांगितले की, आपण पाहिले तर प्रत्येक रेल्वे स्थानकामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता आहे. इमर्जन्सी मेडिकल सेंटर रात्र पाळीमध्ये चालू राहिले पाहिजे. तेथे डॉक्टर वेळेवर नियमित हजर असले पाहिजे. त्याशिवाय सर्व पलाठ्यांवर प्रसाधन गृहांची सोय 24 तास असली पाहिजे. तसेच लोकलच्या संख्या आणि फेरी या देखील अधिक झाल्या पाहिजे.



दिव्यांग्यांसाठी स्वतंत्र ट्रेन: दिव्यांग प्रवासी संघटनेचे श्रीराम पाटणकर सातत्याने रेल्वे महामंडळाकडे पाठपुरा करीत लढा देतात. त्यांनी सांगितले की, दिव्यांगांच्या डब्यामध्ये सर्वसाधारण माणसे चढतात, तर कधी नजर चुकवून चढतात; तर कधी जाणून बुजून चढतात त्याचे कारण प्रचंड गर्दी असते. मात्र याबाबत रेल्वेने आता सर्वसाधारण डब्याच्या सोबत अधिकचे चार-पाच डबे दिव्यांगांसाठी जोडले पाहिजे. कारण त्यांची देखील संख्या वाढलेली आहे. तसेच दिव्यांग्यांसाठी स्वतंत्र ट्रेन देखील चालवल्या पाहिजे, म्हणजे समान संधीचा अवसर त्यांना रेल्वे प्रवास करताना प्राप्त होईल.

हेही वाचा: Sakal Hindu Samaj Morcha: दादर येथे आज सकल हिंदू समाज मोर्चा; 'हे' आहेत वाहतुकीत बदल

Last Updated : Jan 29, 2023, 9:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.