ETV Bharat / state

NIA claimed : उमेश कोल्हे यांची हत्या पैगंबर यांच्या कथित अपमानाचा बदला घेण्यासाठी... एनआयएचा आरोपपत्रात दावा

author img

By

Published : Dec 20, 2022, 6:54 AM IST

अमरावतीत नुपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून अमरावतीचे मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली (murder of Umesh Kolhe ) होती. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात आरोप पत्र दाखल केले आहे. त्यात कोल्हेंची हत्या तबलिगी जमातच्या कट्टरपंथी इस्लामवाद्यांनी पैगंबर यांच्या अपमानचा बदला घेण्यासाठी (revenge insult of Prophet by Tablighi Jamaat) केली होती, असे एनआयएने आरोपपत्रात म्हटले (NIA claimed in charge sheet) आहे.

Bombay Sessions Court
मुंबई सत्र न्यायालय

मुंबई : अमरावतीतील उमेश कोल्हे हत्याकांडात राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबई सत्र न्यायालयातील (Bombay Sessions Court) विशेष एनआयए न्यायालयात आरोप पत्र दाखल केले आहे. या आरोप पत्रात एनआयएने दावा केला आहे की, उमेश कोल्हे यांची हत्या तबलिगी जमातच्या कट्टरपंथी इस्लामवाद्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या कथित अपमानाचा बदला घेण्यासाठी उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली (murder of Umesh Kolhe to revenge) आहे.


अपमानाचा बदला : अमरावती येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांनी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्ट शेअर केल्या होत्या. उमेश कोल्हेची हत्या तबलिगी जमातच्या कट्टरपंथी इस्लामवाद्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या कथित अपमानाचा बदला घेण्यासाठी केली होती, असे एनआयएने येथील न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले (revenge insult of Prophet by Tablighi Jamaat) आहे.



वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन : कट्टरपंथी लोकांच्या टोळीने केलेले दहशतवादी कृत्य असल्याचे एनआयएने आपल्या आरोप पत्रात म्हटले आहे. एनआयएने म्हटले की कोल्हे यांनी कथितपणे धार्मिक भावना दुखवणाऱ्या व्यक्तींची हत्या करून नवीन उदाहरण तयार करण्याचा या कट्टरपंथीय टोळीचे उद्दिष्ट होते. कोल्हे यांनी 21 जून रोजी भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांना केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन करणारी सोशल मीडिया पोस्ट शेअर केल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली (murder of Umesh Kolhe to revenge) होती.


धार्मिक कट्टरता : उमेश कोल्हे यांच्या हत्येमुळे सार्वजनिक शांतता, राष्ट्रीय अखंडता बिघडली आणि केवळ अमरावतीच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सामान्य जनतेची सुरक्षा देखील धोक्यात आली, असा दावा तपास यंत्रणा एनआयएने केला आहे. कोल्हे यांच्या हत्येचा गुन्हेगारी कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले ज्यांचा मालमत्तेचा वाद नाही, आरोपींसोबत भांडणाचा इतिहास नाही. भाजप नेते शर्मा यांच्या समर्थनार्थ व्हॉट्सअॅप पोस्ट टाकणाऱ्या कोल्हेचा बदला घेण्यासाठी आरोपींनी एक दहशतवादी टोळी तयार केली होती. ज्यामध्ये अत्यंत धार्मिक कट्टरता होती. दहशतवादी टोळी 'गुस्ताख ए नबी की एक ही सजा सार तन से जुडा' या क्रूरतेच्या विचारसरणीने खूप प्रभावित होती, असे एनआयएने म्हटले आहे.

आरोपी : एनआयएकडून आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये इरफान खान (32), मुदस्सर अहमद उर्फ ​​सोनू रजा शेख इब्राहिम (22), शाहरुख पठाण उर्फ ​​बादशाशा हिदायत खान (25), अब्दुल तौफिक उर्फ ​​नानू शेख तस्लीम (24), शोएब खान उर्फ ​​भुर्या साबीर खान (22), अतीब रशीद आदिल रशीद (22), युसूफ खान बहादूर खान (44) यांचा समावेश (NIA claimed in charge sheet) आहे.



काय आहे प्रकरण? नुपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आले आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्त्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र आज तब्बल 12 दिवसांच्या तापसानंतर अमरावती शहर पोलीसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचे ट्विट केले. त्यानंतर अमरावती पोलीसांनी ही माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.