ETV Bharat / state

Nawab Malik reply to Devendra Fadnavis : भाजपला कात्रजचा घाट दाखवला आता काशीचा घाट दाखवू - मंत्री नवाब मलिक

author img

By

Published : Jan 17, 2022, 6:34 PM IST

nawab malik and devendra fadnavis
नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी कात्रजचा घाट दाखवला. आता होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला शरद पवार हे काशीचा घाट दाखवतील, असा पलटवार अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. ( Minister Nawab Malik reply to Devendra Fadnavis )

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस हा केवळ साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे, अशी टीका राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी केली होती. मात्र, राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी कात्रजचा घाट दाखवला. आता होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला शरद पवार हे काशीचा घाट दाखवतील, असा पलटवार अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. ( Minister Nawab Malik reply to Devendra Fadnavis ) देवेंद्र फडणीस यांनी साडेतीन जिल्ह्याच्या बाहेर जाऊन कोणाचे कोठे किती आमदार आहेत? हे तपासावे. शरद पवार हे राज्यात मुख्यमंत्री असताना त्यांचे राज्यात 25 आमदारही निवडून येत नव्हते, असा टोलाही नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

माध्यमांशी बोलताना मंत्री नवाब मलिक

गोव्यात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमुळे आघाडीत विघ्न -

महाराष्ट्र राज्य प्रमाणेच गोव्यामध्ये देखील महाविकास आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र, गोव्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या चुकीच्या धोरणामुळेच गोव्यामध्ये महाविकास आघाडी अस्तित्वात येत नाही. मात्र उद्या शिवसेनेचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मिळून गोव्याच्या आघाडीबाबत घोषणा करतील, असे संकेत नवाब मलिक यांनी दिले आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या चुकीच्या धोरणामुळेच गेल्या वेळेस काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावं लागलं याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. तसेच मणिपूरमध्ये काँग्रेससोबत तर उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पक्ष सोबत राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

उत्पल पर्रीकर बाबत शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवर उद्या चर्चा -

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट नाकारलं असल्याने ते पणजी मधून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. उत्पल परिकर यांच्या विरोधात कोणत्याही पक्षाने आपला उमेदवार देऊ नये, असे आवाहन शिवसेने कडून करण्यात आले. शिवसेनेने केलेल्या आवाहनाबाबत उद्या होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नक्की चर्चा होईल. याबाबत घोषणाही केली जाईल, असे संकेत नवाब मलिक यांनी दिले. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना उमेदवारी देणार नाही, असे भारतीय जनता पक्ष सांगत होते. मात्र, ज्या काँग्रेस नेत्यावर भारतीय जनता पक्ष गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा आरोप वेळोवेळी करत होती. त्याच नेत्याला आपल्या पक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष उमेदवारी देत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट दिलं जाते, हे पुन्हा एकदा सिद्ध होत असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

हेही वाचा - सरकारचा दबाव आणून नितेश राणेंवर गुन्हे दाखल, आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास - केंद्रीय मंत्री दानवे

समीर वानखेडे प्रकरणावर काय म्हणाले मंत्री मलिक -

एनसीबीचे माजी विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांच्याविरोधात जिल्हा जात पडताळणी समितीसमोर उद्या (मंगळवारी) होणारी सुनावणी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे होणार नाही. तर पुढील महिन्यात 17 फेब्रुवारीला ही सुनावणी होणार असल्याची माहिती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.