ETV Bharat / state

'शेतकऱ्यांच्या मदतीचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत'

author img

By

Published : Oct 19, 2020, 6:43 PM IST

शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकार घेणार असून कॅबिनेटच्या बैठकीत सरकार निश्चितरुपाने मदत जाहीर करेल. तसेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने केंद्रानेही मदत करावी, अशी अपेक्षा असल्याचे मंत्री नवाब मलिक म्हणाले.

नवाब मलिक
नवाब मलिक

मुंबई - कुठल्याही शेतकर्‍यांना अडचणीच्या काळात अडचणीत राहू देणार नाही. शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकार घेणार असून कॅबिनेटच्या बैठकीत सरकार निश्चितरुपाने मदत जाहीर करेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

विविध जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (दि. 19 ऑक्टोबर) दौऱ्यावर आहेत. तर कालपासून (दि. 18 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा सुरू केला. त्याच पार्श्वभूमीवर मलिक यांनी सांगितले की, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून त्यांना वार्‍यावर सोडणार नाही त्यांना लवकरच मदत केली जाईल.

बोलताना मंत्री नवाब मलिक
अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही केंद्र सरकारकडे शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवाय मुख्यमंत्रीही दौर्‍यावर आहेत. दौर्‍यावरुन परत आल्यावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितरुपाने भरपाई देण्याची भूमिका राहणार आहे. त्याचबरोबर इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यावर केंद्राचीही मदत करण्याची जबाबदारी असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.

हेही वाचा - महापौर व चिटणीसांनी राजीनामा द्यावा; भाजपाची महानगरपालिका मुख्यालयात निदर्शने

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.