ETV Bharat / state

Rupali Chakankar Demand: हरवलेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी 'महा महिला आयोगा'ची समिती स्थापन करण्याची मागणी

author img

By

Published : May 16, 2023, 8:25 PM IST

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या (एमएससीडब्ल्यू) अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राज्यातून हरवलेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी 'महा महिला आयोगा'ची समिती स्थापन करावी, अशी मागणी राज्याच्या गृह विभागाला केली आहे. दर पंधरवड्याला त्याच्या प्रगतीचा अहवाल, विभागाला सादर करावा असेही त्या म्हणाल्या.

Rupali Chakankar Demand
रुपाली चाकणकर

मुंबई: या वर्षी १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत ३,५९४ महिला बेपत्ता झाल्या आणि त्यापैकी काहींचा शोध लागला. राज्यातून महिला व मुली बेपत्ता होत आहेत, ही गंभीर बाब असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सोमवारी सांगितले. गृह विभागाचे सहायक सचिव विशेष पोलीस महानिरीक्षक (महिला व बालगुन्हेगारी प्रतिबंध) दीपक पांडे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

काय आहे निवेदनात? 'एमएससीडब्ल्यू'ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बेपत्ता महिलांसाठी शोध समिती स्थापन करण्याचे निर्देश चाकणकर यांनी गृह विभागाला दिले आहेत आणि विभागाने प्रत्येक पंधरा दिवसांनी समितीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा, असेही सुचविले गेले.

आमिष दाखवून परदेशात पाठविण्याचा प्रकार: रुपाली चाकणकर म्हणाल्या की, बेपत्ता महिलांसाठी अस्तित्वात असलेल्या शोध समित्यांमध्ये कोणतेही पोलीस अधिकारी नाहीत. यावर्षी १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत ३,५९४ महिला बेपत्ता झाल्या असून त्यापैकी काहींचा शोध लागला आहे. अजूनही ही गंभीर बाब आहे. मुंबईतील साकीनाका परिसरातील दोन दलालांवर महिलांना आमिष दाखवून त्यांना परदेशात पाठवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि, असे आकडे प्रचंड असून अशा प्रकरणी कठोर कारवाईची गरज आहे, असे चाकणकर म्हणाले.

16 ते 35 वयोगटातील महिलांची मोठी संख्या: भरोसा सेल आणि मिसिंग सेल केवळ कागदावर कार्यरत आहेत. राज्यातून महिला व मुली बेपत्ता होत आहेत, ही गंभीर बाब आहे. बेपत्ता झालेल्या मुली आणि महिलांमध्ये 16 ते 35 वयोगटातील महिलांची मोठी संख्या आहे. पश्चिम आशियाई देशांमध्ये हरवलेल्या महिलांचा तात्काळ शोध न घेतल्याने त्या सापडल्याच नाहीत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागातील 82 कुटुंबातील महिला परदेशात गेल्या असून त्यांचा आता शोध लागत नाही. त्यांच्याशी कोणताही संपर्क नाही, या गंभीर बाबींकडे चाकणकरांनी लक्ष वेधले.

हेही वाचा:

  1. Vande Bharat Express : गोव्याला जाणाऱ्यासाठी आनंदाची बातमी; लवकरच धावणार मुंबई-गोवा मार्गावर 'वंदे भारत एक्स्प्रेस'
  2. Jowari Bajri On Ration Card : आता ज्वारी, बाजरी मिळणार शिधापत्रिकेवर
  3. Action Against Rioters : नाशिक, अकोला, शेवगावातील दंगलखोरांवर कठोर कारवाई करणार; मुख्यमंत्र्यांचे आदेश
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.