ETV Bharat / state

BJP Free Maharashtra: भाजपमुक्त महाराष्ट्र बनविण्याचा संकल्प - एच. के. पाटील

author img

By

Published : Jun 13, 2023, 10:51 PM IST

राज्यात भविष्यात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गरवारे क्लब हाऊसमध्ये काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. महाराष्ट्रातून भाजपला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकत्र राहून एकजुटीने लढणे गरजेचे आहे. 'भाजपमुक्त महाराष्ट्र बनवूया' असा संकल्प आजच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली.
BJP Free Maharashtra
पटोले

भाजपविषयी बोलताना नाना पटोले

मुंबई: भाजपमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र राहून लढणार आहोत. कर्नाटकमधील नागरिकांचेसुद्धा आभार मानतो. काँग्रेस पक्षाचा प्रभाव ज्याप्रमाणे कर्नाटकात दिसला तसाच परिणाम महाराष्ट्रात दिसेल, असा विश्वास एच. के. पाटील यांनी व्यक्त केला. आज इतर काही विषयांवर देखील चर्चा झाली.


म्हणून वारकऱ्यांवर लाठीचार्ज : महाराष्ट्रात सरकार शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. तत्कालीन राज्यपाल यांनी आणि भाजपच्या अर्धा डझन मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. अनेक वर्षांची वारकरी यांची प्रथा वर्षानुवर्षे चालत आहे. अतिशय नियोजन पद्धतीने वारी प्रथा चालत आहे. या प्रथेला कसे बंद करता येईल, यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. या परंपरेला संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस काही झालेच नाही असे दाखवत, खोटे बोलत असल्याचा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला.



मेरिटवर चर्चा: आजच्या कोर कमिटीच्या बैठकीत सरकारच्या विरोधातील लढ्या संदर्भात चर्चा झाली. निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीकोनातून मतदारसंघातील मेरिटच्या संदर्भात चर्चा झाली. उमेदवार निवडून येईल त्या मेरिटच्या आधारे ती जागा त्या पक्षाला दिली जाईल. निवडणुकी विषयी पुढील रणनीती अखण्यात आली. मेरिटच्या आधारावर आपण पुढे जाऊ असे महाविकास आघाडीत ठरले होते. जागा जिंकणे हे आम्हा सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे मागील जागा कोणाकडे आता कोणाकडे आहे असा काही वाद आमच्यात नाही. याउलट शिंदे गटात आणि भाजपमध्ये काय वाद सुरू आहे, असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.


दोस्त दोस्त न रहा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयीची पसंती देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा जास्त असल्याच्या आशयाच्या बातम्या मंगळवारी राज्यातील सर्व दैनिकात जाहिरातीसह प्रसिद्ध झाल्या. यावरून मुख्यमंत्री शिंदे यांना टार्गेट करत जाहिरात देऊन आमच्या मित्राला दुखावले आहे. 'दोस्त दोस्त ना रहा' अशी परिस्थिती आमच्या मित्राची म्हणजे फडणवीसांची झाली असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. जो सर्वे आला आहे त्यावर आम्ही जाणार नाही. देवेंद्र फडणवीस यांची जी गत झाली आहे, याचे आम्हाला दुःख असल्याचा टोलाही पटोले यांनी लगावला.


आमच्यात भांडणं लावू नका: महाविकास आघाडीत जागा वाटपावरून अजित पवार यांच्या प्रश्नांना उत्तरे देतांना अजित पवार काय म्हणतात याला महत्त्व नसून आमच्यात म्हणजे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. तुम्ही आमच्यात का भांडणे लावता तसेच अजित पवार आजकाल आनंदी असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले आहे.

हेही वाचा:

  1. Eknath Shinde : 'फोटो असो किंवा नसो, लोकांच्या मनात आम्हीच' ; जाहिरातीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
  2. Ajit Pawar : जाहिरातबाजीने शिंदेनी स्वत:चं हसं केलं - अजित पवार
  3. Jitendra Awhad : 'एकनाथ शिंदेंची महत्वाकांक्षा राक्षसी, देवेंद्र फडणवीसांना..', जितेंद्र आव्हाड यांचा टोला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.