ETV Bharat / state

Javed Akhtar: जावेद अख्तर यांना मुंबई सत्र न्यायालयाचा अंतरिम दिलासा नाही, पुढील सुनावणी 17 फेब्रुवारी रोजी

author img

By

Published : Jan 30, 2023, 5:40 PM IST

प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या विरोधात मुलुंड महानगर दंडाधिकारी न्यायालयाने 6 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याकरिता समन्स जारी केले होते. या विरोधात अख्तर यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. मात्र काही कारणास्तव कोर्टात आज या प्रकरणावर सुनावणी झाली नाही. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 17 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे अख्तर मुलुंड कोर्टात 6 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याची शक्यता आहे.

Javed Akhtar
जावेद अख्तर

जावेद अख्तर यांना मुंबई सत्र न्यायालयाचा अंतरिम दिलासा नाही

मुंबई: जावेद अख्तर यांना मुलुंड कोर्टात सहा फेब्रुवारी रोजी हजर राहावे लागणार आहे. आज सत्र न्यायालात सुनावणी न झाल्यामुळे यासंदर्भात पुढील कायदेशीर चर्चा सुरू आहे. असे जावेद अख्तर यांचे वकील जय भारद्वाज यांनी सांगितले आहे. सप्टेंबर 2021 मध्ये जावेद अख्तर यांना तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांची तुलना एका टीव्ही चॅनलला इंटरव्यू दरम्यान केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेमध्ये जावेद अख्तर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. जावेद अख्तर यांना 6 फेब्रुवारी रोजी मुलुंड कोर्टात हजर राहण्याचे समन्स जारी केले होते.



मानहानीची तक्रार दाखल: जावेद अख्तर यांचे वकील जय कुमार भारद्वाज यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे की, तक्रारदाराकडे कोणतीही लोकस स्टँडी नव्हती. त्यांनी संघटनेच्या वतीने मानहानीची तक्रार दाखल करण्याचा अधिकार देणारे आरएसएसकडून कोणतेही अधिकार पत्र रेकॉर्डवर ठेवलेले नाही. प्रतिवादी क्रमांक दोन तक्रारकर्ता स्वतःला आरएसएसचा समर्थक स्वयंसेवक म्हणवतात. तीन अभिव्यक्ती वेगवेगळ्या अर्थांना सूचित करतात. तक्रारीच्या अगदी वाचनातून प्रतिसादक क्रमांकाची भूमिका काय आहे हे स्पष्ट नाही असे याचिकेत म्हटले आहे.




अडचणी वाढण्याची चिन्हे: या प्रकरणात न्यायालयाने अख्तर यांना प्रत्यक्षात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या विरोधात वकील संतोष दुबे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने जावेद अख्तर यांना दिले असल्याने यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केल्याप्रकरणी हा खटला दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने जावेद अख्तर यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीशीमध्ये जावेद अख्तर यांनी पुढील सुनावणीसाठी प्रत्यक्षात न्यायालयासमोर हजर रहावे असे नमूद करण्यात आले आहे. तक्रारदार वकील संतोष दुबे यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये गीतकार कवी जावेद अख्तर यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता आयपीसी कलम 499 आणि 500 बदनामीची कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता मुलुंड महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.





काय आहे प्रकरण: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलसारख्या संघटनांचेही लक्ष्य तालिबानसारखेच आहे आणि भारतीय संविधान त्यांच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे. असे वक्तव्य जावेद अख्तर यांनी केले होते. त्यावरून वाद निर्माण झाला असून भाजपने अख्तर यांच्याकडे माफीची मागणी केली आहे.




अख्तर यांचे शब्द नक्की काय होते?: तालिबानचे समर्थन करणाऱ्या मुस्लिमांबद्दल जावेद अख्तर म्हणाले त्यांची वक्तव्ये माझ्या लक्षात नाहीत. मात्र अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्याचे मोजक्या मुस्लिमांनी समर्थन केले आहे. त्यांची वक्तव्ये ऐकून धक्का बसला. आज भारतातील बहुतेक तरुण मुस्लिमांना चांगली नोकरी आणि त्यांच्या मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण मिळावे असे वाटते. तर दुसरीकडे असे काही लोक आहेत जे प्रतिगामी विचारांचे समर्थन करीत आहेत. जिथे महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जातो अशा प्रतिगामी विचारांना ते प्रोत्साहन देत आहेत.



हेही वाचा: Javed Akhtar जावेद अख्तर यांच्यावरील पुढील सुनावणी 30 जानेवारीला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.