ETV Bharat / state

महाराष्ट्र सत्ता स्थापनेचा तिढा : त्वरित सत्ता स्थापन करा, जनेतेची मागणी

author img

By

Published : Nov 12, 2019, 4:22 PM IST

निकाल लागून 20 व्या दिवशीही सत्तास्थापनेचे घोडे अडलेलेच असून यासंदर्भात लातुरातील नागरिकांना काय वाटते हे 'ईटीव्ही भारत'ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी जनतेने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

महाराष्ट्र सत्ता स्थापनेचा तिढा

लातूर - राज्यात सत्तास्थापनेवरून रणकंदन सुरू आहे. तासागणीक राजकीय समीकरणे बदलत असून सर्वच राजकीय पक्ष सांभाळून त्यांची भूमिका मांडत आहेत. असे असले तरी सामान्य जनतेचे प्रश्न आणि शेतकऱ्यांची अडचण सोडवण्यासाठी त्वरित सत्तास्थापन करण्याची मागणी आता जनता करू लागली आहे. निवडणुकीचा निकाल लागून 20 दिवसाचा कालावधी गेला तरी केवळ स्वार्थापोटी राजकीय नेते हे आपली भूमिका बदलत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

जनेतेच्या सत्ता स्थापनेबद्दल प्रतिक्रिया

हेही वाचा - अरे बापरे..! महिलेच्या पोटातून निघाला चक्क बारा किलोचा गोळा

निकाल लागून 20 व्या दिवशीही सत्तास्थापनेचे घोडे अडलेलेच असून यासंदर्भात लातुरातील नागरिकांना काय वाटते हे 'ईटीव्ही भारत'ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी जनतेने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

हेही वाचा - लातुरात जिल्हा प्रशासनाकडून डेड-लाईनचे पालन ; पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण

विधानसभा निवडणुकीनंतर राज्याला स्थिर सरकार मिळेल, अशी आशा होती. मात्र, ना महायुतीने ते सिद्ध केले आहे ना आघाडीने. राज्याच्या आणि देशाच्या राजधानीत बैठकांचे सत्र अविरतपणे सुरू असले तरी प्रत्यक्षात निर्णय होत नाही. मुख्यमंत्री पदावरून जो तो रस्सीखेच करत आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी कोणत्याही राजकीय पक्षाला सहानुभूती राहिली नाही. किमान मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी तरी सत्तास्थापन करण्याची मागणी आता जनता करू लागली आहे. मित्रपक्षांमध्येच एकी नसून ते काय जनतेचे हित साधणार? असाही सवाल नागरिकांनी केला आहे.

Intro:संताप मतदारांचा : राजकीय नेत्यांचे स्वार्थ अन सर्वसामान्य जनतेचे हाल
लातूर : राज्यात सत्तास्थापणेवरून रणकंदन सुरू आहे. तासागणीस राजकीय समीकरणे बदलत असून सर्वच राजकीय पक्ष हे स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही टोकाला जात आहेत. असे असले तरी सामान्य जनतेचे प्रश्न आणि शेतकऱ्यांची अडचण सोडविण्यासाठी त्वरित सत्तास्थापन करण्याची मागणी आता जनता करू लागली आहे. निवडणूकीचा निकाल लागून 20 दिवसाचा कालावधी लोटला तरी केवळ स्वार्थापोटी राजकीय नेते हे आपली भूमिका बदलत असल्याचे मत आता नागरिक व्यक्त करू लागले आहेत.


Body:विधानसभा निवडणुकिंनंतर राज्याला स्थिर सरकार मिळेल अशी आशा होती. मात्र, ना महायुतीने ते सिद्ध केले आहे ना आघाडीने. राज्याच्या आणि देशाच्या राजधानीत बैठकांचे सत्र अविरतपणे सुरू असले तरी प्रत्यक्षात निर्णय होत नाही. मुख्यमंत्री पदावरून जो तो रस्सीखेच करीत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी कोणत्याही राजकीय पक्षाला सहानभूती राहिली नसून किमान मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी तरी सत्तास्थापन करण्याची मागणी आता जनता करू लागली आहे. मित्रपक्षांमध्येच एकी नसून ते काय जनतेचे हित साधणार असाही सवाल आता नागरिक करू लागले आहेत. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास नुकसानच आहे. सर्व स्थिती लक्षात येत असताना केवळ स्वार्थासाठी निर्णय घेतला जात नाही. ही लोकशाहीची गळचेपी असल्याची भावना आता नागरिक व्यक्त करू लागले आहेत.


Conclusion:आज 20 व्या दिवशीही सत्तास्थापणेचे घोडे अडलेलेच असून यासंदर्भात लातूरतील नागरिकांना काय वाटते हे 'ईटीव्ही भारत'च्या जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामधून जनतेने आपल्या मनातील खदखदत व्यक्त केली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.