कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 18 वी ऊस परिषद कोल्हापुरातील जयसिंगपूर या ठिकाणी पार पडत आहे. विक्रमसिंह मैदानात ही ऊस परिषद सुरू असून हजारोंच्या संख्येने शेतकरी याठिकाणी दाखल झाले आहे. नूतन आमदार देवेंद्र भुयार हे सुद्धा या परिषदेला उपस्थित आहेत. खरंतर सकाळपासूनच महाराष्ट्रामध्ये जे सत्तानाट्य सुरू आहे याबाबत माजी खासदार राजू शेट्टींनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत विधिमंडळाची ग्रामपंचायत झाल्याचे म्हटले आहे. शिवाय वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.
विधीमंडळाची ग्रामपंचायत झाली आहे - राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १८ वी ऊस परिषद कोल्हापुरातील जयसिंगपूर मध्ये पार पडत आहे. यावेळी राज्यातील सत्तानाट्यावर शेतकरीस संघटनेचे नेते राजू शेट्टी यानी भाष्य केले.
![विधीमंडळाची ग्रामपंचायत झाली आहे - राजू शेट्टी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5155738-927-5155738-1574512860633.jpg?imwidth=3840)
कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 18 वी ऊस परिषद कोल्हापुरातील जयसिंगपूर या ठिकाणी पार पडत आहे. विक्रमसिंह मैदानात ही ऊस परिषद सुरू असून हजारोंच्या संख्येने शेतकरी याठिकाणी दाखल झाले आहे. नूतन आमदार देवेंद्र भुयार हे सुद्धा या परिषदेला उपस्थित आहेत. खरंतर सकाळपासूनच महाराष्ट्रामध्ये जे सत्तानाट्य सुरू आहे याबाबत माजी खासदार राजू शेट्टींनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत विधिमंडळाची ग्रामपंचायत झाल्याचे म्हटले आहे. शिवाय वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.