ETV Bharat / state

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरूच राहणार, पाणीही वर्ज

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2023, 5:42 PM IST

Updated : Nov 2, 2023, 8:28 AM IST

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे. आजपासून पाणीही वर्ज करणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली. जर वेळ दिला तर आरक्षण मिळणार का, यासह अनेक प्रश्न जरांगे पाटील यांनी उपस्थित केले आहेत.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

जालना Manoj Jarange Patil : सर्वपक्षीय बैठकीतून मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यावर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारनं अध्यादेश रद्द करावा. सरकारला वेळ द्यायचा की नाही हे सरकारशी बोलून ठरवू. मी चुकीच करणार नाही, मग तुम्ही योग्य करणार का? सरकारला वेळ दिला म्हणजे आरक्षण मिळणार का? गरिबांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. वेळ दिल्यावर सरसकट आरक्षण देण्यात येणार का? आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन थांबविणार नाही. वेळ कशासाठी पाहिजे ते सांगा, असे प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केले आहेत.

मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम : आम्हाला अर्धवट आरक्षण नको आहे. मी उपोषणाला बसल्यानंतर 7 ते 8 दिवसांनी वेळ मागत आहात. आपण आरक्षण कसं देणार हे सांगा. मराठा समाजाचा किती अंत पाहणार आहात. मी चर्चेसाठी बोलावूनही सरकार चर्चेसाठी आलं नाही. फडणवीस यांनी यावं मराठे अडविणार नाहीत. आजपासून मी पाणी प्यायचं सोडणार आहे. शांततेचं युद्ध आता सरकारला पेलवणार नाही. कोणताही पक्ष आपाला नाही. मराठ्यांना राजकीय नेत्यांनी वेड्यात काढल्याचं जरांगे यांनी म्हटलंय.मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे : राज्यातील सर्व पक्ष एकत्र काम करण्यास तयार आहेत. इतर समाजावर अन्याय न करता मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे यावर सर्व पक्षांनी एकमत दर्शवलं आहे. मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोग युद्धपातळीवर काम करत आहे, मनोज जरांगे यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा, मराठा समाजानं संयम राखावा, मनोज जरांगे यांनी सरकारला सहकार्य करावं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

कायमस्वरूपी आरक्षण देऊ : आम्ही मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण देऊ, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आम्ही आरक्षणाच्या बाजूनं आहोत. सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली आहे. 3 निवृत्त न्यायमूर्तींची समिती गठित करण्यात आली असं शिंदे यांनी म्हटलं आहे.सरकारला थोडा वेळ द्यावा : "मराठा समाजानं थोडा संयम ठेवावा. सरकारला थोडा वेळ द्यावा. मनोज जरांगे यांनी उपोषण मागं घ्यावं. संपूर्ण मराठा समाजानं सहकार्य करावं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यात कायदा सुव्यवस्था, शांतता राखण्यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यासाठी आजच्या बैठकीत सर्वपक्षीय ठराव करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

हेही वाचा

  1. Maratha Protest : मराठा आरक्षणाचं लोन मंत्रालय आणि विधानभवनापर्यंत; दगाफटका होण्याची शक्यता - सुप्रिया सुळे
  2. Maratha Protest : मराठा आंदोलकांनी अजित पवार, उदय सामंताचं बॅनर फाडलं
  3. Maratha Reservation All Party Meeting: आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं सर्वपक्षीय बैठकीत नाराजी, एकमतानं 'हा' केला ठराव
Last Updated : Nov 2, 2023, 8:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.