ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात पावसाची हजेरी; बळीराजाला दिलासा

author img

By

Published : Aug 29, 2019, 6:34 PM IST

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार आणि हिंगोली तालुक्यातील भांडेगाव, खंडाळा, जयपूरवाडी या भागात आज पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील पावसाची हजेरी; बळीराजाला दिलासा

हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार आणि हिंगोली तालुक्यातील भांडेगाव, खंडाळा, जयपूरवाडी या भागात आज पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील पावसाची हजेरी

खरिपाचे पीक तोंडाशी आल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. आज पावसाने काही प्रमाणात का होईना हजेरी लावल्याने सोयाबीन आणि तूर ही पिके धोक्याबाहेर आली आहेत. मात्र, जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला नसल्याने अजूनही काही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.

शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जाणाऱ्या पोळा सणाची आज कर आहे. त्यामुळे सर्व शेतकरी खांदे मळणीच्या कामात व्यग्र असल्याचे पाहायला मिळत आहे. अशात सणाचे औचित्य साधून आज झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

Intro:
हिंगोली- जिल्ह्यातील विविध भागात आज हजेरी लावलेल्या पावसाने खरीप पिकांना दिलासा मिळालंय. शेतकरी पावसाची चातकासारखी प्रतीक्षा करीत होते मात्र आज पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी काही प्रमाणात समाधानी झाले आहेत.


.Body:ओंढा नागनात तालुक्यातील जवळा बाजार अन हिंगोली तालुक्यातील भांडेगाव, खंडाळा, जयपूरवाडी याच भागात हा तुरळक पाऊस झालाय. सध्या खरिपाचे पीक तोंडाशी येऊन ठेपले सोयाबीनला शेंगा लागतात तर मुगाच्या शेंगा आता बऱ्यापैकी पडल्या आहेत त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पावसाची खूप प्रतीक्षा लागली होती आज पावसाने हजेरी लावली मात्र तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या ने काही प्रमाणात का होईना धोक्याबाहेर निघाली आहेत मात्र हा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र झाला नसल्याने. अजूनही शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे शेतकऱ्याचा महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जाणाऱ्या पोळ्याची आज कर असल्याने सर्व शेतकरी खांदे मळणी च्या कामात व्यस्त असल्याचे पहावयास मिळाले. आज झालेल्या पावसाने मात्र शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला अजूनही शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहेConclusion:तर जिल्ह्यातील काही शेतकरी उपलब्ध असलेल्या पाण्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न करत आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.