ETV Bharat / state

पावसामुळे जनजीवन विस्कळीत; अनेक गावांचा संपर्क तुटला

author img

By

Published : Aug 27, 2019, 10:02 AM IST

चिमूर तालुक्यात रविवारपासून संततधार पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरले आहेत. तसेच हिंगणघाट, वर्धा, पिपरडा सिंदेवाही, पिपळणेरी भिशी, खडसंग, मुरपार आदी गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच चिमूर आगारातील अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

चिमूर तालुक्यात रविवारपासून संततधार पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

चंद्रपूर - चिमूर तालुक्यात रविवारपासून संततधार पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरले आहेत. यामुळे शहराजवळील १९५ लोकवस्ती असलेल्या चिखलापार गावाला चारही बाजूंनी पाण्याने वेढल्याने बेटाचे स्वरूप आले आहे. चिमूरपासून हिंगणघाट, वर्धा, पिपरडा सिंदेवाही, पिपळणेरी भिशी, खडसंग, मुरपार आदी गावाचा संपर्कही तुटला आहे. तसेच चिमूर आगारातील अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

चिमूर तालुक्यात रविवारपासून संततधार पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

तसेच सावरगाव येथील दोन तलाव तुडूंब भरले असून, हे तलाव फुटण्याची भिती उप विभागीय अधिकारी भैय्यासाहेब बेहरे यांनी व्यक्त केली. त्यामुळे तातडीने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी परिस्थितीची पहाणी करून गावकऱ्यांना चिमूर येथील शेतकरी भवनात हलवले आहे.

दरवर्षीच्या पुराने स्थानिकांसाठी गावांचे रस्ते बंद होतात. याविषयी गावकऱ्यांनी वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधींपुढे गऱ्हाणे मांडले. परंतु, लोकप्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारची सोय न केल्याने ऐनवेळी प्रशासनाला या पुरासंदर्भात माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी भैय्यासाहेब बेहरे यांनी स्वत: हजर राहून सरपंच व इतर गावकऱ्यांना चिमूर येथील शेतकरी भवनात हलवले. सर्व गावकऱयांची जेवण व औषधांची व्यवस्था प्रशासनाने केली आहे.

Intro:चंद्रपुर : चिमूर तालुक्यात रविवार रात्रीपासुन संततधार पाऊसाने नदी नाले तुडूंब भरले आहेत. ज्यामूळे शहरा पासुन पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या १९५ लोकवस्तिचे चिखलापार या गावाला चारही बाजुंनी नदि नाल्यानी वेढल्याने बेटाचे स्वरूप आले आहे.

तसेच सावरगाव येथील दोन तलाव तुडूंब भरले असुन ते तलाव फुटण्याच्या भिती उप विभागीय अधिकारी भैय्यासाहेब बेहरे यांना व्यक्त केली आहे. त्यामूळे तातडीने त्यांनी परीस्थितीची पाहणी करूण गावकऱ्यांना चिमूर येथील शेतकरी भवन येथे हलविले. चिमूर शहरापासुन जवळच असलेल्या चिखलापार येथे जोराचा पाऊस आला की नेहमीच बेटाचे स्वरूप येते. अशा परिस्थित गावकऱ्यांना बाहेर निघण्या करीता कोणताही मजबुत मार्ग नाही. या विषयी गावकऱ्यांनी आजपर्यंत झालेल्या लोकप्रतिनिधी पूढे गऱ्हाणे मांडले मात्र लोकप्रतिनिधीनी कोणत्याही प्रकारची चांगली सोय करूण दिली नाही. त्यामूळे रविवारी रात्रो आलेल्या पाऊसाने गावास वेढले असता. प्रशासनाला याची माहीती देण्यात आली. माहीती मिळताच उपविभागीय अधिकारी भैय्यासाहेब बेहरे यांनी जातीने हजर राहून सरपंच व इतर गावकऱ्यांना समजावित चिमूर येथील शेतकरी भवन येथे हलविण्या संबधी निर्णय घेतला. बचाव करण्यात आलेल्या सर्व गावकऱ्यांना शेतकरी भवन येथे रहाण्याची , खाण्याची , औषधांची व्यवस्था प्रशासणाने केली आहे.

*पावसामुळे जनजीवन विस्कळीत*

रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या संततधार पावसाने तालुक्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे चिमूर पासून हिंगणघाट, वर्धा, पिपरडा सिंदेवाही, पिपळणेरी भिशी, खडसंग, मुरपार आदी गावाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाली. चिमूर आगारातील अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.