ETV Bharat / state

Fadnavis On Maratha Reservation : मराठा, ओबीसी समाजात भांडणे लावण्याची सरकारची भूमिका नाही; देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 5:11 PM IST

Fadnavis On Maratha Reservation
देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

Fadnavis On Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसी समाजातून (state govt role on Maratha reservation) आरक्षण देणार नाही. (Maratha reservation) दोन्ही समाजात भांडणे लावणारा आमचा (OBC reservation) पक्ष नव्हे. ओबीसी समाजाच्या (Maratha community reservation from OBC) आरक्षणाला कुठल्याही पद्धतीने (Rabindra Tonge fast) धक्का लागणार नाही, असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला दिलं आहे. (Deputy CM Devendra Fadnavis)

मराठा आरक्षण वादावर ओबीसींना आश्वस्त करताना फडणवीस

चंद्रपूर Fadnavis On Maratha Reservation : ओबीसी समाजाचे रवींद्र टोंगे यांचं आमरण उपोषण सोडविण्यासाठी आज (शनिवारी) फडणवीस चंद्रपुरात आले होते. यावेळी ते बोलत होते. उपोषणकर्त्यांना मोसंबीचा रस देऊन हे आंदोलन समाप्त झालं असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं.

रवींद्र टोंग यांचे रुग्णालयातही आंदोलन सुरूच : मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये, यासाठी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी 11 सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यादरम्यान रुग्णालयात देखील त्यांनी हे आंदोलन सुरूच ठेवलं होतं. यादरम्यान विजय बल्की आणि प्रेमानंद जोगी बेमुदत उपोषणावर बसले. त्यानंतर 23 सप्टेंबरला जनता महाविद्यालयासमोर नागपूर मार्गावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आलं. तर २४ सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यंमत्री, बहुजन कल्याणमंत्री यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली गेली. तर 25 सप्टेंबरला लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं.

जिल्हा बंद आंदोलन मागे : यानंतर काल (शुक्रवारी) 29 सप्टेंबरला राज्य सरकारकडून राज्यातील ओबीसी प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ओबीसी आंदोलनकर्ते पदाधिकारी देखील सामील होते. मात्र, या चर्चेत तोडगा निघाल्याने आज 30 सप्टेंबरचे जिल्हा बंद आंदोलन मागे घेण्यात आले. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी उपोषणस्थळी भेट देत हे उपोषण संपवलं.


'त्या' दोन्ही वेगवेगळ्या बाबी : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मात्र हे आरक्षण ओबीसी कोट्यातून दिलं जाणार नाही. याबाबत सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. मराठा समाजाचा ओबीसी समाजात समावेश केला जाणार नाही किंवा मराठा समाजाला सरसकट ओबीसी समाजात सामील करून घेणार, हीसुद्धा बाब खोटी आहे असंही यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

बिहारची जनगणना झाल्यावर महाराष्ट्राची वेळ : बिहारच्या धर्तीवर ओबीसींची जातीय जनगणना करण्यात यावी अशी मागणी ओबीसी समाजाकडून केली जात आहे. यावर महाराष्ट्र सरकार लक्ष ठेऊन आहे. आधी बिहारची जनगणना होऊ द्या. या नंतर काय परिणाम येतात ते बघू आणि त्यानंतर त्यात सुधारणा करून जनगणना करू असं आश्वासन देखील फडणवीस यांनी दिलं.

हेही वाचा:

  1. Maratha Reservation Row : मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, आजपासून मराठा आरक्षण संवाद दौऱ्यास सुरुवात
  2. Sanjay Raut on Dasara Melava : शिंदेंच्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली होती का? दसरा मेळाव्यावरुन राऊतांचा हल्लाबोल
  3. Rahul Narvekar Foreign Tour : मुख्यमंत्र्यांपाठोपाठ विधानसभा अध्यक्षांची परदेशवारी रद्द, ठाकरे गटाची 'ती' चाल यशस्वी?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.