ETV Bharat / state

चर्चा करण्याऐवजी सीटीपीएसचे पांगविण्यासाठी प्रयत्न; आंदोलनकर्त्यांचा सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा

author img

By

Published : Aug 6, 2020, 7:45 PM IST

Updated : Aug 6, 2020, 10:19 PM IST

प्रकल्पग्रस्त मोबाईलमधून व्हीडिओ काढून आपल्या मागण्या सांगत आहेत. या चिमणीमध्ये मोबाईल चार्ज करण्याची सुविधा होती. मात्र, ती थांबविण्यासाठी या संपूर्ण चिमणीचाच वीजपुरवठा खंडित करण्यात आला. कुठल्याही इतर प्रकल्पग्रस्तांना वीज केंद्राच्या आवारातही येऊ दिले जात नाही आहे. चिमणीवरील आंदोलनकर्ते मागील 24 तासांपेक्षा जास्त वेळ उपाशी आहेत.

agitation for job in chandrapur, administration igore the demand
आंदोलनकर्ता पोहोचला चिमणीवर, वीज केंद्रात नोकरी देण्याची मागणी

चंद्रपूर - महाऔष्णिक वीज केंद्रात नोकरी देण्यात यावी, या मागणीसाठी वीज केंद्राच्या चिमणीवर चढून प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात महिलांचाही समावेश आहे. यातील एकाने तर चिमणीवरुन उडी घेण्याचा प्रयत्न केला. त्याला इतर जणांनी पकडल्याने पुढील अनर्थ टळला. या आंदोलनाला तीस तासांपेक्षा अधिकचा वेळ झाला आहे. मात्र, वीज केंद्राचे प्रशासन कुठलाही तोडगा काढण्यासाठी उत्सुक नाही. उलट या प्रकल्पग्रस्तांची क्रूर थट्टा करण्यात येत आहे.

चर्चा करण्याऐवजी सीटीपीएसचे पांगविण्यासाठी प्रयत्न; आंदोलनकर्त्यांचा सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा

मुख्य अभियंता राजू घुगे यांना चिमणीवर चढलेले प्रकल्पग्रस्त वारंवार फोन करीत आहेत. मात्र, ते त्यांना राँग नंबर सांगत बोलणे टाळत आहेत. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्याऐवजी त्यांना पांगवण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहे.

हे प्रकल्पग्रस्त मोबाईलमधून व्हिडिओ काढून आपल्या मागण्या सांगत आहेत. या चिमणीमध्ये मोबाईल चार्ज करण्याची सुविधा होती. मात्र, ती थांबविण्यासाठी या संपूर्ण चिमणीचाच वीजपुरवठा खंडित करण्यात आला. कुठल्याही इतर प्रकल्पग्रस्तांना वीज केंद्राच्या आवारातही येऊ दिले जात नाही आहे. चिमणीवरील आंदोलनकर्ते मागील 24 तासांपेक्षा जास्त वेळ उपाशी आहेत. त्यांनी पाणीही पिलेले नाही. यामुळे ते अशक्त झाले आहेत. त्यांना चक्कर येत आहे. त्यांना साधे पाणी पाठविण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली नाही. अशावेळी कोणी खाली कोसळले तर याची जबाबदारी कोण घेणार? हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

मुख्य अभियंता राजू घूगे आणि उप अभियंता ओसवाल दोन्ही कुठलीही प्रतिसाद देत नाहीत, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

चंद्रपूर वीज केंद्रासाठी प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून सेवेत ठेवण्यात आले आहे. नोकरी मिळण्यासाठी त्यांना शिक्षणाची अट आहे. यामुळे अनेकजण नोकरी मिळण्यास मुकले. त्यामुळे कुठलीही अट न ठेवता आम्हाला नोकरी देण्यात यावी अन्यथा आम्ही आत्महत्या करू, असा इशारा देत बुधवारी सकाळी सहा प्रकल्पग्रस्त चिमणीवर चढले. यामध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे.

वास्तविक वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा करुन तोडगा काढायला हवा होता. मात्र, आपल्या असंवेदनशीलतेचा परिचय देत कुठलीही चर्चा करण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या विषयाबाबत प्रशासन किती गंभीर आहे, हे यानिमित्ताने समोर आले आहे.

Last Updated : Aug 6, 2020, 10:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.