ETV Bharat / state

'अवकाळी पावसाने झालेल्या पिकांचे अन् घरांच्या पडझडीचे तत्काळ पंचनामे करा'

author img

By

Published : May 14, 2020, 4:18 PM IST

राजुरी नवगण परिसरात पाहणी करून आमदार संदीप क्षीरसागर यांनी नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत, असे आदेश महसूल प्रशासनाला दिले आहेत.

'अवकाळी पावसाने झालेल्या पिकांचे अन् घरांच्या पडझडीचे तत्काळ पंचनामे करा'
'अवकाळी पावसाने झालेल्या पिकांचे अन् घरांच्या पडझडीचे तत्काळ पंचनामे करा'

बीड - जिल्ह्यात बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यात मोठ्या प्रमाणात राहत्या घराची पडझड होऊन नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत. वीजेचे पोल जमीनदोस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राजुरी नवगण परिसरात पाहणी करून आमदार संदीप क्षीरसागर यांनी नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत, असे आदेश महसूल प्रशासनाला दिले आहेत.

बीड तालुक्यातील अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळबागा व टरबूज, खरबूज आणि घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. या नुकसानीची राजुरी नवगण परिसरात जाऊन संदीप क्षीरसागर यांनी पाहणी केली. तसेच पंचनामे करण्याचे आदेश बीड, शिरूर तहसीलदार यांना दिले आहेत. या नुकसानीची माहिती तत्काळ तलाठी, ग्रामसेवक, सरपंच यांनी वरिष्ठ कार्यालयास द्यावे, असेही यावेळी त्यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.