ETV Bharat / state

नुकसानीचे पंचनामे करण्यात मराठवाड्यात बीड जिल्हा अव्वल, ८९७ गावांचे पंचनामे पूर्ण

author img

By

Published : Nov 8, 2019, 10:27 AM IST

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासन स्तरावर सुरू आहे... या कामांमध्ये मराठवाड्यात बीड जिल्हा सर्वात पुढे असल्याची माहिती बीडचे जिल्हाधिकारी कुमार पांडे यांनी दिली...

बीड जिल्ह्यातील ८९७ गावांचे पंचनामे पूर्ण

बीड - राज्यात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासन स्तरावर सुरू आहे. या कामांमध्ये मराठवाड्यातील बीड जिल्हा सर्वात पुढे असल्याची माहिती बीडचे जिल्हाधिकारी कुमार पांडे यांनी दिली आहे.

नुकसानीचे पंचनामे करण्यात मराठवाड्यात बीड जिल्हा अव्वल, जिल्ह्यातील ८९७ गावांचे पंचनामे पूर्ण

हेही वाचा... नाशिकात कांद्याचे दर कोसळले; शेतकरी आर्थिक संकटात

मराठवाड्यात आतापर्यंत ७५ % क्षेत्रावरील पंचनामे झाले आहेत. यात बीड जिल्ह्यात ८३.५७ % म्हणजे ४ लाख ९७ हजार क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. पुढील दोन दिवसात उर्वरित नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी पांडे यांनी सांगितले. मागील चार दिवसापूर्वी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वतः बीड जिल्ह्यातील काही गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली होती. बीड जिल्ह्यात १४०२ गावांमध्ये ५ लाख ६७ हजार शेतकऱ्यांचे ५ लाख ९५ हजार हेक्टरवरील पीक बाधित झाले आहे. त्यापैकी ८९७ गावांमधील ४ लाख २७ हजार ८२९ शेतकऱ्यांचे ४ लाख ९७ हजार ६५१ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झालेले आहेत. ही टक्केवारी ८३ . ५७ % इतकी असून मराठवाड्यात सर्वाधिक आहे.

हेही वाचा... पंचनाम्याच्या प्रश्नांना वैतागून शेतकऱ्याने जाळली सोयाबीनची गंजी; जिंतूर तालुक्यातील प्रकार

अशी आहे मराठवाड्यातील नुकसानीची आकडेवारी

मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यात लातूर ६६.८६% (२ लाख ७० हजार हेक्टर ), परभणी ७६.३६% (२ लाख ५१ हजार हेक्टर ), उस्मानाबाद ६५.७७% (२ लाख १६ हजार हेक्टर ), औरंगाबाद ७३%, जालना ७९%, हिंगोली ६९.३३%, नांदेड ७८.४८% इतक्या क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. ज्या ज्या ठिकाणी पंचनामे पूर्ण झाले आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी नुकसानीचे प्रमाण ३३ टक्क्यांहून अधिक आहे.

Intro:८९७ गावांचे पंचनामे पूर्ण; नुकसानीचे पंचनामे करण्यात बीड मराठवाड्यात अव्वल

बीड  : परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासन स्तरावर सुरू आहे. या कामांमध्ये मराठवाड्यात बीड जिल्हा सर्वात पुढे असल्याची माहिती बीडचे जिल्हाधिकारी कुमार पांडे यांनी दिली आहे.

मराठवाड्यात आज पर्यंत ७५ % क्षेत्रावरील पंचनामे झाले आहेत. बीड जिल्ह्यात ८३. ५७ % म्हणजे ४ लाख ९७ हजार क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. पुढील दोन दिवसात उर्वरित नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी पांडे यांनी सांगितले. मागील चार दिवसापूर्वी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वतः बीड जिल्ह्यातील काही गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली होती. बीड जिल्ह्यात १४०२ गावांमध्ये ५ लाख ६७ हजार शेतकऱ्यांचे ५ लाख ९५ हजार हेक्टरवरील पीक बाधित झाले आहे. त्यापैकी ८९७ गावांमधील ४ लाख २७ हजार ८२९ शेतकऱ्यांचे ४ लाख ९७ हजार ६५१ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झालेले आहेत. ही टक्केवारी ८३ . ५७ % इतकी असून मराठवाड्यात सर्वाधिक आहे. 

अशी आहे मराठवाड्यातील नुकसानीची आकडेवारी-

मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यात लातूर ६६. ८६ % (२ लाख ७० हजार हेक्टर ), परभणी ७६. ३६ % (२ लाख ५१ हजार हेक्टर ),उस्मानाबाद ६५. ७७ % (२ लाख १६ हजार हेक्टर ) , औरंगाबाद ७३%, जालना ७९%, हिंगोली ६९. ३३ % , नांदेड ७८. ४८ % इतक्या क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. ज्याज्या ठिकाणी पंचनामे पूर्ण झाले आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी नुकसानीचे प्रमाण ३३ टक्क्यांहून अधिक आहे.Body:बीडConclusion:बीड

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.