ETV Bharat / state

सोयगाव येथे घरकुल योजनेसाठी मुख्याधिकाऱ्यास घेराव

author img

By

Published : Jan 22, 2021, 3:51 PM IST

नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांना प्रधान मंत्री निवास योजनेची घरकुल मंजूर झालेले असून ही यादी वर्षभरानंतर नगर पंचायतीने प्रसिद्ध केल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे.

प्रहार संघटनेच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला
प्रहार संघटनेच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला

सिल्लोड - सोयगाव शहरातील बेघरांना घरकुल मिळण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. लाभार्थ्यांना तत्काळ घरकुल योजनेसाठी जमीन संपादीत करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
यादी जाहीर नसल्याने प्रहार संघटना आक्रमक
सोयगाव नगर पंचायतीतर्फे शहरातील बेघर नागरिकांसाठी वर्ष २०१७ मध्ये यादी पीमसी कडे पाठवली होती. २६६ लाभार्थ्यांना घरे मंजूर झालेले आहेत. ही यादी गेल्या दोन वर्षांपासून नगर पंचायात मध्ये धूळखात पडून असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या प्रकरणी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष कृष्णा जुंनघरे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत यादी जाहीर करण्याची मागणी केली. अखेर हरकती व दुरुस्तीसाठी यादी नगर पंचायत बोर्डावर लावण्यात आल्या आहेत. मात्र त्यात संपादीत जमिनीची माहिती नसल्याने लाभार्थी संतप्त झाले आहेत.

प्रहार संघटनेच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला
लाभार्थ्यांनी घातला घेरावया मंजूर घरकुल लाभार्थ्यांच्या याद्या नगर पंचायतीने प्रसिद्द करताच शहरातील लाभार्थ्यांनी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांसह नगर पंचायत गाठून प्रभारी मुख्यधिकारी शेख यांना घेराव घातला. त्यावेळी उपस्थित लाभार्थ्यांनी जाब विचारत तातडीने घरकुल योजना राबविण्यासाठी संपादित जमिनीची माहिती देण्याची मागणी केली. यावेळी मुख्याधिकारी शेख व कार्यालयीन अधीक्षक भगवान शिंदे यांनी लाभार्थ्यांचा रोष पाहून सोयगाव नगर पंचायत क्षेत्रातील गट क्रमांक ५,६,२६९,२७०,२७८, व २७९ हे शासनाच्या मालकीचे भूखंड असल्याची माहिती दिली. या पैकी कोणताही एक भूखंड निवडण्यात येणार असल्याचे समर्पक ऊत्तर देत पीएमसीने नियुक्त केलेले संस्था संचालक काकडे यांच्याशी संपर्क केला व त्यांना सोयगावला येऊन घरकुल योजना अंमलबजावणी करण्यास सुचविले आहे.२६ जानेवारीपर्यंत अंमलबजावणी करादरम्यान या घरकुल योजनेची अंमलबजावणी येत्या २६ जानेवारी पासून न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहार शेतकरी संघटनेसह प्रजा सुराज्य पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे कृष्णा पाटील, संदीप इंगळे, प्रजा सुराज्य पक्षाचे शरद आण्णा तिगोटे, रामेश्वर शिरसाठ, अशोक खेडकर,यांच्यासह लाभार्थ्यांची उपस्थिती होती.

हेही वाचा - दहा रुपयांच्या वादातून दगडाने ठेचून खून! औरंगाबादच्या वाळुंज येथील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.