ETV Bharat / state

लष्करी अळीमुळे शेतकरी हवालदिल

author img

By

Published : Jul 17, 2019, 8:18 PM IST

शेतकरी

लष्करी अळीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

औरंगाबाद - लष्करी अळीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. मक्याचं पीक लावल्यानंतर काही दिवसात लष्करी आळीच्या हल्ल्यामुळे लावलेला मका काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली असून दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

लष्करी अळीमुळे शेतकरी हवालदिल


औरंगाबादच्या पिसादेवी येथील सुरेश काळे या शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी २ एकर शेतात मका लावला होता. मात्र, काही दिवसातच मक्यावर लष्करी अळीने हल्ला केला. यामुळे सर्व मका काढून टाकण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.


काही दिवसांपूर्वी कृषी विभागाने जिल्हाधिकारी यांच्यासोबत शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्या इशाऱ्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिले नसल्याचे दिसून आले. त्यामुळेच पिसादेवी येथील सुरेश काळे या शेतकऱ्याला दोन एकरात लावलेला मक्याचे पिक काढून टाकावे लागले. जवळपास १० ते १५ हजार रुपये खर्च करून मका लावला. मात्र, काळजी न घेतल्याने मका काढून बाजरीची पेरणी करायची वेळ त्याच्यावर आली आहे. कसेबसे पैसे जमवून बाजरी पेरली. मात्र, पाऊस साथ देईल का? हा प्रश्न सुरेश काळे यांना पडला आहे. कृषी विभागाचा सल्ला न ऐकल्याने अनेक शेतकऱ्यांवर असे संकट आल्याचे दिसून येत आहे.

Intro:लष्करी आळी मुळे शेतकरी अडचणीत आलाय. मक्याचं पीक लावल्यानंतर काही दिवसात लष्करी आळीच्या हल्ल्यामुळे लावलेली मका काढुन टाकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली असून दुबार पेरणी करावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.


Body:औरंगाबादच्या पिसादेवी येथील सुरेश काळे या शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी दोन एकर शेतात मका लावला. मात्र काही दिवसातच मक्यावर लष्करी आळीने हल्ला केला आणि त्यात सर्व मका।काढून टाकण्याची वेळ त्याच्यावर आली.


Conclusion:काही दिवसांपूर्वी कृषी विभागाने जिल्हाधिकारी यांच्यासोबत शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. मात्र त्या इशाऱ्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिलं नसल्याचं दिसून आलं. त्यामुळेच पिसादेवी येथील सुरेश काळे या शेतकऱ्याला दोन एकरात लावलेली मका काढून टाकावी लागली. जवळपास 10 ते 15 हजार रुपये खर्च करून मका लावली खरी मात्र काळजी न घेतल्याने मका काढून ज्वारीची पेरणी करायची वेळ त्याच्यावर आली. कसेबसे पैसे जमवून ज्वारी पेरली खरी मात्र पाऊस साथ देईल का? हा प्रश्न मात्र सुरेश काळे यांना पडलाय. कृषी विभागाचा सल्ला न ऐकल्याने अनेक शेतकऱ्यांवर अस संकट आल्याच दिसून येत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.