अमरावती - राज्य शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या माध्यमातून स्वच्छता हीच सेवा या राष्ट्रव्यापी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये अमरावतीच्या दर्यापूर येथील विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला होता. या संकल्पांतर्गत विद्यार्थ्यांनी १० हजार कागदी पिशव्या तयार केल्या आहेत.
हे ही वाचा - भिवंडीतील प्लास्टिक कारखान्यांवर पर्यावरण मंत्र्यांची कारवाई; हजारो टन प्लास्टिक जप्त
राज्य ससरकारने संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी केली आहे. दर्यापूरच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी या प्रकल्पात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी तब्बल १० हजार कागदी पिशव्या तयार केल्या. राज्य शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या माध्यमातून स्वच्छता हीच सेवा या राष्ट्रव्यापी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ५ हजार विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या १० हजार कागदी पिशव्या दुकानांमध्ये तसेच ग्राहकांना देण्यात येणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. प्लास्टिकला शहरातून हद्दपार करण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.
हे ही वाचा - येत्या 6 महिन्यात महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त होईल, पर्यावरण मंत्र्यांना विश्वास