ETV Bharat / state

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : खासदार राणांकडून अमरावतीच्या अंतोरा गावातील पूरग्रस्त शेतीची पाहणी

author img

By

Published : Jul 2, 2020, 9:16 PM IST

अमरावती शहरापासून अवघ्या 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंतोरागावा नजीकच्या एका नाल्याला दरवर्षी पावसाळ्यात वारंवार पूर येऊन शेकडो हेक्टरवरील शेतीचे नुकसान होत आहे. मंगळवारी (दि. 30 जून) रात्री आलेल्या पावसामुळे दुबार पेरणी केलेले बियाणे या नाल्याच्या पुरामुळे खरडून गेले त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता या शेकडो शेतकऱ्यांवर तीबार पेरणीचे संकट येणार आहे. याबाबात ईटीव्ही भारतने दिलेल्या बातमीची दखल घेत खासदार राणा यांना या गावाला भेट दिली.

नवनीतकौर राणा
गावकऱ्यांशी संवाद साधताना

अमरावती - शहरापासून अवघ्या 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंतोरा गावानजीकच्या एका नाल्याला दरवर्षी पावसाळ्यात वारंवार पूर येऊन शेकडो हेक्टरवरील शेतीचे नुकसान होत आहे. मंगळवारी (दि. 30 जून) रात्री आलेल्या पावसामुळे दुबार पेरणी केलेले बियाणे या नाल्याच्या पुरामुळे खरडून गेले त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता या शेकडो शेतकऱ्यांवर तीबार पेरणीचे संकट येणार आहे. दरम्यान, या नुकसग्रस्त शेतकऱ्यांची आपली कैफियत ईटीव्ही भारतने बातमीच्या माध्यमातून मांडल्यानंतर त्या बातमीची दखल घेत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी या नुकसानग्रस्त शेत जमिनीची पाहणी केली. लवकरात लवकर याचा पाठपुरावा करून या नाल्याचे खोलीकरण करून शेतकऱ्यांची समस्या सोडवणार असल्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले. सोबतच या गावातील दोन गावांना जोडणार पूल आठ वर्षांपूर्वी कोसळलेल्या पुलाचीही पाहणी खासदार राणा यांनी केली.

बोलताना खासदार राणा
अमरावतीपासून अवघ्या 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंतोरा गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी नाल्याला येणाऱ्या पुरामुळे लाखोंचे नुकसान सहन करावे लागते. यावर्षी शेतकऱ्यांनी 13 जूनला पेरणी केल्यानंतर 14 जूनला झालेल्या मुसळधार पावसामुळे त्या नाल्याला पूर आला. नाला लहान असल्याने नाला फुटून नाल्याचे सर्व पाणी शेतात घुसले. यामुळे संपूर्ण जमीन खरडून निघाली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी कशीबशी उसनवार पैसे करून दुबार पेरणी केली. मात्र, मंगळवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा दुबार पेरणी केलेली पिकेही खरडून गेली. यामुळे शेतकऱ्यांचे पुन्हा लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे या शेतकऱ्यांवर तीबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.

या नाल्याच्या बांधकामासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीच दखल घेतली नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सामुहिक आत्महत्येचा इशारा दिला होता. दरम्यान, या शेतकऱ्यांनी आपली कैफियत 'ईटीवी भारत'समोर मांडताच याची दखल घेत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आज (दि. 2 जुलै) त्यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाल्या, मागील अनेक वर्षांपासून या लोकांची समस्या आहे. पण, कुठलाच लोकप्रतिनिधी ही समस्या सोडवू शकले नाही. दरवर्षी या नाल्याला येणाऱ्या पुरामुळे पाचशे एकरवर शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्याचे पंचनामे केले जातात. पण, शेतकर्‍यांना मदत मिळत नसल्याचे राणा म्हणाल्या. पुढे या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बातमीची घेतली खासदारांनी दखल - तिबार पेरणीचं संकट..! अमरावतीच्या अंतोरा गावातील शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.