ETV Bharat / state

महाविकास आघाडी सरकारचा विदर्भातील रुग्णांवर अन्याय, माजी कृषीमंत्र्यांचा आरोप

author img

By

Published : Dec 11, 2019, 10:12 PM IST

विदर्भातील रुग्णांना व नातेवाईकांना मुंबईत मंत्रालयामध्ये चकरा मारणे शक्य नसल्याने फडणवीस यांनी नागपूरलाच मुख्यमंत्री साहाय्यता निधीचे केंद्र व निर्णय प्रक्रिया कार्यालय निर्माण केले होते. आघाडी सरकारद्वारे हे केंद्र बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्व रुग्णांना व नातेवाईकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीचे अर्ज मंत्रालय, मुंबई येथे पाठवावे लागत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने पहिला आसूड विदर्भातील रुग्णांवर ओढलेला आहे, असा आरोप माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला.

former agriculture minister dr anil bonde
डॉ. अनिल बोंडे

अमरावती - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून रुग्णांवर उपचारासाठी भरीव मदत दिली जात होती. विदर्भातील रुग्णांसाठी नागपूर येथे मुख्यमंत्री साहाय्यता निधीचे विशेष केंद्र फडणवीसांनी सुरू केले होते. महाविकास आघाडीने नागपूरचे मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष बंद केले आहे. त्याचा पहिला फटका विदर्भातील रुग्णांना बसला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने विदर्भातील रुग्णांवर अन्याय केला असल्याचा आरोप माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला.

फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधून यकृताचे आजार, अंधत्वाचे आजार, कर्करोग, बहिरेपणा इत्यादी आजारांसाठी भरीव मदत दिली जात होती. ९०० कोटी रुपयांच्यावर आर्थिक मदतीने रुग्णांना दिलासा दिला होता. विदर्भातील रुग्णांना व नातेवाईकांना मुंबईत मंत्रालयामध्ये चकरा मारणे शक्य नसल्याने फडणवीस यांनी नागपूरलाच मुख्यमंत्री साहाय्यता निधीचे केंद्र व निर्णय प्रक्रिया कार्यालय निर्माण केले होते. आघाडी सरकारद्वारे हे केंद्र बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्व रुग्णांना व नातेवाईकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीचे अर्ज मंत्रालय मुंबई येथे पाठवावे लागत आहे.

हे वाचलं का? - 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यलय' मुंबईमध्ये स्थलांतरित झाल्याने विदर्भातील जनतेला त्रास होणार नाही - नितीन राऊत

मंत्रालयात मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षामध्ये कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आलेली आहे. त्यामुळे विदर्भातील रुग्णांना वेळेत मदत मिळणे शक्य होत नाही. अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया या निधीअभावी प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने पहिला आसूड विदर्भातील रुग्णांवर ओढलेला आहे. विदर्भातील रुग्ण मंत्रालयात चकरा मारू शकत नसल्याने उपचाराविना तडफडतो आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीचे केंद्र व निर्णय प्रक्रिया कार्यालय विदर्भातच नागपूरला पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी बोंडे यांनी केली आहे.

Intro:महाविकास आघाडी सरकारचा विदर्भातील रुग्णांवर अन्याय
– माजी कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांचा आरोप



ANCHOR - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार मध्ये संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून रुग्णावर उपचाराकरिता भरीव मदत केल्या जात होती. विदर्भातील रुग्णांकरिता नागपूर येथे मुख्यमंत्री सहायता निधीचे विशेष केंद्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केले होते. विदर्भातील रुग्णाला मिळणारी हि सुविधा महाविकास आघाडी सरकारने थांबविलेली आहे. नागपूरचे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष बंद करून पहिला फटका महाविकास आघाडी सरकारने विदर्भातील रुग्णांना मारला असल्याचा आरोप राज्याचे माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे.


VO - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकार्यकाळामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी मधून यकृताचे आजार,अंधाव्ताचे आजार, कॅन्सर, बहिरेपणा इत्यादी आजारांकारिता भरीव मदत केल्या जात होती. ९०० कोटी रुपयाच्या वर आर्थिक मदतीने रुग्णांना दिलासा देण्यात आलेला होता. विदर्भातील रुग्णांना व नातेवाईकांना मुंबई मंत्रालय येथे येर-झारा मारणे शक्य नसल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरलाच मुख्यमंत्री सहायता निधीचे केंद्र व निर्णय प्रक्रिया कार्यालय निर्माण केले होते. आघाडी सरकारद्वारे हे केंद्र बंदकरण्यात आले असून आता सर्व रुग्णांना व नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीचे अर्ज मंत्रालय मुंबई येथे पाठवावे लागत आहे. मंत्रालय मुंबई येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामध्ये कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे विदर्भातील रुग्णांना वेळेत मदत मिळणे शक्य होत नाही. अनेक रुग्णाच्या शस्त्रक्रिया मुख्यमंत्री सहायता निधी अभावी प्रलंबित आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीसरकारने पहिला आसूड विदर्भातील रुग्णांवर ओढलेला आहे. विदर्भातील रुग्ण मंत्रालयमुंबई येथे येर-झारा घालू शकत नसल्याने उपचाराविना तडफडतो आहे. तरी मुख्यमंत्री सहायता निधीचे केंद्र व निर्णय प्रक्रिया कार्यालय विदर्भातच नागपूरला पुन्हा सुरु करण्यात यावी अशी मागणी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.

बाईट - डॉ. अनिल बोंडे ( माजी कृषिमंत्री )Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.