ETV Bharat / state

शेत मार्गावर महिलेचे अतिक्रमण; 20 जणांचा शेतमाल बाहेर आणायचा कसा?

author img

By

Published : Oct 5, 2020, 11:51 AM IST

शेत मार्गावर महिलेचे अतिक्रमण
शेत मार्गावर महिलेचे अतिक्रमण

भातकुली तालुक्यात येणाऱ्या बैलमारखेड गावातील एका महिलेने शेतरस्त्यावर अतिक्रमण केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या प्रकरणी तहसीलकडे तक्रारकरूनही ती महिला जुमानत नाही, आणि प्रशासनानेही कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

अमरावती - भातकुली तालुक्यात येणाऱ्या बैलमारखेड गावात ग्रामस्थांच्या शेतशिवाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका महिलेने झोपडी बांधून कुंपण घालत आतिक्रमण केले आहे. या महिलेच्या या अतिक्रमाणामुळे या मार्गावरून जाणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना शेतमालाच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. विषेश म्हणजे सदर महिलेला शासनाकडून घरकूल बांधून मिळाले असतानाही तिने केलेल्या या प्रतापामुळे गावातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्रिवेणी गजानन डोंगरदिवे असे त्या महिलेचे नाव आहे.

शेत मार्गावर महिलेचे अतिक्रमण
शेत मार्गावर महिलेचे अतिक्रमण
बैलमारखेड या 650 लोकसंख्या असणाऱ्या छोट्याशा गावाच्या पश्चमीकडे गावातील 20 जणांची शेती आहे. गावातून या शेतात जाणाऱ्या मार्गावर त्रिवेणी गजानन डोंगरदिवे या महिलेने 7 महिन्यांपासून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या रस्तावरून जाणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात बैलगाडी, ट्रॅक्टर घेऊन जाण्यास रस्ताच उरला नाही. सध्या शेतात सोयाबीन, कापूस या पिकांची काढणी झाली आहे. मात्र, या पिकाचे निघालेलं उत्पादन घरी कसे आणायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
शेत मार्गावर महिलेचे अतिक्रमण

त्रिवेणी डोंगरदिवे ही महिला मुलासह महेर असणाऱ्या बैलमारखेड गावात राहत असून तिला शासनाकडून या गावात घरकुलही मिळाले आहे. घरकुल मिळाले असतानाही तिने ग्रामस्थांच्या शेतीचा मार्ग अतिक्रमण करून बंद केला आहे. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे तसेच भातकुलीच्या तहसीलदारांकडे तक्रार देऊनही कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आता पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनीच गावातील शेतकऱ्यांच्या अडचणींची दाखल घ्यावी, अशी मागणी बैलमारखेडातील या शेतकऱ्यांनी केली आहे.

याबाबत गावचे माजी पोलीस पाटील रमेश बंजारी, सतीश बैलमारे, नंदकिशोर पुंडकर यांनी' ईटीव्ही भारत'ला याची माहिती दिली. तसेच जिल्हा प्रशासनाने आपली जबाबदारी झटकणाऱ्या ग्रामपंचायतवरही कारवाई करावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.


ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.