ETV Bharat / state

सोलापूर लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार? प्रकाश आंबेडकर यांचे सुचक वक्तव्य

author img

By

Published : Mar 11, 2019, 12:08 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी युती यांची चर्चा सुरू असताना प्रकाश आंबेडकर यांच्या मंगळवारी होणाऱ्या घोषणेने युतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाची ओळख काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून असल्याने आता शिंदेंच्या अडचणीतही वाढ होणार आहे.

प्रकाश आंबेडकर

अकोला - भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार याबाबत अनेक आडाखे बांधले जात असताना अखेर त्यांनी आज याबाबत सुचक वक्तव्य केले आहे. ते अकोला येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या उमेदवारीची अधिकृत घोषणा मंगळवारी मुंबईत करणार असल्याचे स्पष्ट केले. आंबेडकरांनी सोलापूरमधून लढण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसच्या अडचणींमध्ये मात्र वाढ होणार असल्याचे दिसत आहे.

अकोला येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी युती यांची चर्चा सुरू असताना प्रकाश आंबेडकर यांच्या मंगळवारी होणाऱ्या घोषणेने युतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाची ओळख काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून असल्याने आता शिंदेंच्या अडचणीतही वाढ होणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचे शरद बनसोडे यांनी शिंदे यांचा मानहानीकारक पराभव केला होता. आता आंबेडकरांचेही आव्हान उभे राहिल्यास काँग्रेससाठी हा सामना अधिक कठीण होईल. दरम्यान, सोलापूरमधील आंबेडकरांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आंबेडकर सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात मते मिळवू शकतील असाही अंदाज वर्तवला जात आहे.

Intro:अकोला - वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांची इच्छा आहे की मी सोलापूर येथुन लढावे. यासंदर्भात मी उद्या भूमिका मुंबई येथे जाहीर करणार आहे, असे अड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे ते नेमके अकोला किंवा सोलापूर येथून लढतात यासंदर्भात त्यांनी कोणताच खुलासा केला नाही.


Body:काही दिवसांपासून काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांमध्ये आघाडीसंदर्भात बैठकी सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आघाडीकडे 22 जागांची मागणी केली आहे. परंतु, काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांना तेवढया जागा देण्यास तयार नाही. बहूजन वंचित आघाडीला 22 जागा द्यायच्या, राजू शेट्टी याना दोन जागा द्यायच्या, अन्य मित्रपक्षांना एक दोन जागा दिल्यावर शिल्लक राहणाऱ्या 10-12 जागा आम्ही वाटून घ्यायचा का, असा सवाल बैठकीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला होता. बहुजन वंचित आघाडी 22 जागांमध्ये नांदेड, बारामती आणि माढा या तीन जागा मागत आहे.

त्या बैठकीत लक्ष्मण माने म्हणाले होते की, मसुदा काय असावा यावर चर्चा झाली आहे. मात्र अंतिम निर्णय व्हायला आहे. राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीत पुढील निर्णय होईल. आम्ही 22 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत, त्या 22 जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे, असे ही ते म्हणाले.
विदर्भातील सर्व मतदारसंघाची निवडणूक एकत्रित पहिल्या टप्प्यात घ्यावी. या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात 12 सर्जिकल स्ट्राइक केले, असा दावा लोकसभेच्या विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. त्यांनी त्या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे द्यावेत, कुठे केलेत आणि कधी केले, या संदर्भातही त्यांनी सांगावे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
भाजप आणि राजनाथ सिंह यांच्या माध्यमातून आम्ही तीन सर्जिकल स्ट्राइक केली, असा दावा केला. राजनाथ सिंग यांनी उरलेले दोन सर्जिकल स्ट्राइक कुठे केलेत व केव्हा केले याचे पुरबे त्यांनी द्यावेत. हे पण लोकांना सांगून सर्जिकल स्ट्राइक च्या नावावर राजकारण सुरू आहे, असे राजकारण होऊ नये, हे निवडणूक आयोगाचे निर्देश असतानाही काँग्रेस आणि भाजपा याचे राजकारण करत आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.


Conclusion:या बाबतील व्हिडीओ पाठवावेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.