ETV Bharat / state

लोणी खून प्रकरणातील चार आरोपींना नाशिक-पुणे जिल्ह्यातून अटक

author img

By

Published : Dec 3, 2019, 10:14 PM IST

राहाता तालुक्यातील लोणी येथे एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी चौघांना नाशिक, पुणे जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्यांना लोणी पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.

अटक आरोपींसह पोलीस पथक
अटक आरोपींसह पोलीस पथक

अहमदनगर - राहाता तालुक्यातील लोणी येथे गोळीबार करून श्रीरामपूर येथील तरुणाचा खून केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासांच्या आत चार आरोपींना अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला व पुणे जिल्ह्यातील शिरूर येथून अटक केली आहे.


अटक केलेल्यांमध्ये सिराज उर्फ सोल्जर आयुब शेख (वय-24 वर्षे), संतोष सुरेश कांबळे (वय-28 वर्षे), गाठण उर्फ शाहरुख उस्मान शहा (वय-20 वर्षे, तीघे रा. बीफ मार्केट जवळ, वार्ड क्र. 2, श्रीरामपूर), अरुण भास्कर चौधरी (वय-23 वर्षे, रा. सोनगाव रोड, खंडोबा मंदीर जवळ, लोणी प्रवरा, ता. राहाता) यांचा समावेश आहे.

फरदीन अबू कुरेशी (वय 18) याला आरोपी सिराज शेख, संतोष कांबळे, शाहरुख शहा यांनी जबरदस्तीने धमकी देऊन त्याला प्रथम नाशिक येथे नेले. त्यानंतर लोणी येथे आणून सोबत असलेले उमेश नागरे, अरुण चौधरी, अक्षय बनसोडे, शुभम कदम (सर्व रा. लोणी, ता. राहाता) यांनी मिळून जुन्या वादाचे कारणावरून गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. यात फरदीन अबू कुरेशी याची हत्या केली होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्ता हिंगडे, मनोहर गोसावी, आण्णा पवार, शंकर चौधरी, रवींद्र कर्डीले, विजय वेठेकर आदींच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील येवला व पुणे जिल्ह्यातील शिरूर येथून चौघांना अटक केली आहे. पुढील चौकशीसाठी त्यांना लोणी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

हेही वाचा - अहमदनगर: हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू

Intro:अहमदनगर- लोणी गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना नाशिक-पुणे जिल्ह्यातून अटक..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_fire_death_arriest_vis_7204297

अहमदनगर- लोणी गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना नाशिक-पुणे जिल्ह्यातून अटक..

अहमदनगर- राहता तालुक्यातील लोणी येथे गोळीबार करून श्रीरामपूर येथील युवकाचा खून केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासांच्या आत चार आरोपींना अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला व पुणे जिल्ह्यातील शिरूर येथून अटक केली आहे.
अटक केलेल्यांमध्ये सिराज उर्फ सोल्जर आयुब शेख (वय-२४ वर्षे, रा. बीफ मार्केट जवळ, वार्ड नं. २, श्रीरामपूर), संतोष सुरेश कांबळे (वय-२८ वर्षे, रा. मुन्नाभाई वखारीचे बाजूला, बीफ मार्केट जवळ, वार्ड नं. २, श्रीरामपूर), गाठण उर्फ शाहरुख उस्मान शहा (वय-२० वर्षे, रा. बीफ मार्केट जवळ, वार्ड नं. २, श्रीरामपूर), अरुण भास्कर चौधरी (वय-२३ वर्षे, रा. सोनगाव रोड, खंडोबा मंदीर जवळ, लोणी प्रवरा, ता. राहाता) यांचा समावेश आहे.

फरदीन आब्बू कुरेशी (वय- १८) याला नाशिक येथे सोबत येण्यासाठी आरोपी सिराज उर्फ सोल्जर आयुब शेख, संतोष सुरेश कांबळे, शाहरुख उस्मान शहा (सर्व रा. श्रीरामपूर) यांनी जबरदस्ती करुन व धमकी देवून त्याला प्रथम नाशिक येथे नेले व त्यानंतर लोणी येथे आणून सोबत असलेले उमेश नागरे, अरुण चौधरी, अक्षय बनसोडे, शुभम कदम (सर्व रा. लोणी, ता- राहाता) अशांनी मिळून जुन्या वादाचे कारणावरुन गावठी कट्टयातून गोळीबार केला. यात फरदीन आब्बू कुरेशी याची हत्या केली होती.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/दत्ता हिंगडे, मनोहर गोसावी, आण्णा पवार, शंकर चौधरी, रविन्द्र कर्डीले, विजय वेठेकर, आदींच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील येवला व पुणे जिल्ह्यातील शिरूर येथून चौघांना अटक केली आहे. पुढील चौकशीसाठी त्यांना लोणी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.

Conclusion:अहमदनगर- लोणी गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना नाशिक-पुणे जिल्ह्यातून अटक..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.