ETV Bharat / sports

Shreyas Iyer : श्रेयस अय्यरने पहिल्या वनडेमध्ये डान्स सेलिब्रेशनचे सांगितले कारण

author img

By

Published : Jul 25, 2022, 9:53 AM IST

श्रेयस अय्यर
श्रेयस अय्यर

Shreyas Iyer : श्रेयस भर मैदानामध्ये डान्स ( Dance cricket ground ) करताना दिसून आला. जो चाहत्यांनाही खूप जास्त प्रमाणात आवडला आहे. पण आता श्रेयसनेच डान्स करण्या पाठीमागचे कारण यावेळी त्यांनी सांगितले आहे. मी फिल्डींग करत होतो आणि वेस्ट इंडिजचे चाहते मला चिडवत होते. कॅच सोडा, कॅच सोड असे, ते म्हणत होते. अशा परिस्थितीत जेव्हा कॅच माझ्याकडे आला, तेव्हा मी त्यांच्यासारखाच नाचलो.

त्रिनिनाद - श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) हा क्रिकेट टीम इंडियातील ( India Cricket Team ) स्टार खेळाडूंपैकी एक खेळाडू आहे. वेस्ट इंडिज ( West Indies ) विरुद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये श्रेयसने संघासाठी 54 रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्यानंतर टीमने 3 रन्सने सामना जिंकला आहे. दरम्यान श्रेयस भर मैदानामध्ये डान्स ( Dance cricket ground ) करताना दिसून आला. जो चाहत्यांनाही खूप जास्त प्रमाणात आवडला आहे. पण आता श्रेयसनेच डान्स करण्या पाठीमागचे कारण यावेळी त्यांनी सांगितले आहे.

चाहते चिडवत होते - श्रेयस अय्यरने आपला सहकारी खेळाडू मोहम्मद सिराजशी संवाद साधताना त्याच्या या डान्स पाठीमागचे कारण सांगितले आहे. तो म्हणाला, 'मी फिल्डींग करत होतो आणि वेस्ट इंडिजचे चाहते मला चिडवत होते. कॅच सोडा, कॅच सोड असे, ते म्हणत होते. अशा परिस्थितीत जेव्हा कॅच माझ्याकडे आला, तेव्हा मी त्यांच्यासारखाच नाचलो.

सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर - श्रेयसच्या या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले आहे की, त्याची प्रतिक्रिया वेस्ट इंडिजच्या प्रेक्षकांच्या कृतीला योग्य प्रत्युत्तर होते. मुळात, श्रेयस खूप चांगला डान्सर आहे. तो त्याच्या सोशल मीडियावर ( Share video on social media ) स्वतःच्या डान्स मूव्हचे व्हिडिओ शेअर करत राहत असतो. शिवाय श्रेयसची सख्खी बहीण देखील खुप चांगली डान्सर आहे.

ओव्हर विषयी चर्चा - पहिल्या वनडे सामन्यात मोहम्मद सिराज आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाज श्रेयस अय्यर यांनी एकमेकांची मुलाखत घेतली होती. बीसीसीआयने या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या मुलाखतीमध्ये सिराजने श्रेयसशी शेवटच्या ओव्हर विषयी चर्चा केली होती. त्यावेळी श्रेयसने शामराह ब्रूक्सचा झेल घेतल्यावर नेमका का डान्स केला याचा खुलासा केला आहे.

चांगल्या कामगिरीची अपेक्षा - टीम इंडिया दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा बरोबर सामना खेळला आहे. कर्णधार शिखर धवनला 3 सामन्यांची मालिका जिंकण्यासाठी टीमच्या खेळाडूंकडून परत एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. भारतीय टीमने पहिला एकदिवसीय सामना 3 रन्सने जिंकला. दुसरा वनडे सामना जिंकून शिखर धवन सिरीज जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी तो टीमच्या प्लेईंग 11 मध्ये काही महत्त्वाचे बदल करू शकणार आहेत.

हेही वाचा - President Murmu Will Take Oath Today : द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार, सरन्यायाधीश देणार शपथ

हेही वाचा - Rajnath Singh On PoK : पाकव्याप्त काश्मीर भारताचाच, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची स्पष्टोक्ती

हेही वाचा - Shiv Sena Vs Election Commission : निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयाचा ठोठावणार दरवाजा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.