ETV Bharat / sports

Shahid Afridi Request To PM Modi : भारत-पाकदरम्यान आशिया चषक 2023 क्रिकेट स्पर्धेसाठी शाहिद अफ्रिदीचे पंतप्रधान मोदींना आवाहन

author img

By

Published : Mar 21, 2023, 12:58 PM IST

Shahid Afridi Request To PM Modi
शाहिद अफ्रिदीचे पंतप्रधान मोदींना आवाहन

आशिया चषक 2023 बाबत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आधीच वाद सुरू आहे. आता पाकिस्तानचा दिग्गज आणि माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने यावर मोठे वक्तव्य केले आहे. दोन्ही देशांमध्ये क्रिकेट स्पर्धा होण्यासाठी शाहिद अफ्रिदीने, आशिया चषकाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे.

नवी दिल्ली : आशिया कप 2023 बाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. सध्या याचे यजमानपद पाकिस्तानकडेच आहे. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी टीम इंडिया पाकिस्तान दौरा करणार नसल्याचे आधीच जाहीर केले आहे. यामुळे आशिया चषक इतरत्र होऊ शकतो. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पाकिस्तानमधील क्रिकेट नियामक मंडळ आशिया चषक त्यांच्या देशात आयोजित करण्याचा निर्धार करीत आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली आहे.

शाहिद अफ्रिदीचे पीएम मोदींना आवाहन : स्पोर्ट्स तकला दिलेल्या मुलाखतीत शाहिद आफ्रिदीने पीएम मोदींना आवाहन केले आणि भारतीय संघाने पाकिस्तानला भेट द्यावी आणि दोन्ही देशांदरम्यान क्रिकेट सामना खेळवला जावा, असे आवाहन केले. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील. पाकिस्तानमधील सुरक्षेबाबत आफ्रिदी म्हणाला की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी अलीकडेच अनेक संघ आपल्या देशात आले आहेत. आफ्रिदी म्हणतो की, 'आम्हालाही भारतातील सुरक्षेचा धोका होता, त्यानंतर दोन्ही देशांच्या सरकारने परवानगी दिली तर नक्कीच भेट देऊ'. आपल्या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान मोदींना दोन्ही देशांदरम्यान क्रिकेट होऊ द्यावे अशी विनंती केली.

पीसीबी आणि बीसीसीआयवर व्यक्त केले मत : शाहिद आफ्रिदीला विचारण्यात आले की पीसीबी कमकुवत आहे का? त्याला उत्तर देताना ते म्हणाले की, 'पीसीबी कमकुवत नाही, पण समोरून काही प्रतिक्रिया यायला हव्यात. मला तुमच्याशी मैत्री करायची असेल आणि तुम्हाला माझ्याशी मैत्री करायची नसेल तर मी काय करू? आफ्रिदीने पीसीबीला कमकुवतही म्हटले नाही आणि बीसीसीआयला मजबूत बोर्ड म्हटले आहे. त्याने पुढे बोलताना सांगितले की, मजबूत व्यक्तीवर अधिक जबाबदारी असते.

आशिया चषक दुसरीकडे घेण्याची मागणी : आशिया चषक 2023 बाबत बीसीसीआयने स्पष्टपणे सांगितले आहे की, ही स्पर्धा इतर ठिकाणी आयोजित केली गेली तर भारतीय संघ त्यात सहभागी होईल. भारताने हा आशिया चषक यूएईमध्ये हलवण्याची मागणी केली आहे. यासोबतच भारताने पाकिस्तानमध्ये आशिया कप खेळण्यास नकार दिला आहे. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा माजी फलंदाज जावेद मियाँदाद संतापला असून त्याने प्रक्षोभक वक्तव्य केले आहे. भारतीय संघ पाकिस्तानात येत नसेल तर आपणही भारत दौरा करू नये, असे मियांदादने म्हटले आहे.

जावेद मियांदादची बीसीसीआयवर टीका : दिग्गज पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियाँदादने आशिया चषकासंदर्भात एक वक्तव्य केले आहे. पाकिस्तानला यजमानपदाची संधी मिळत आहे, अशा स्थितीत आयसीसीने आपली भूमिका बजावून अशा बाबी सोडवाव्यात, असे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर जावेद मियांदाद यांनी बीसीसीआयवर टीका करताना 'गो टू हेल' असा शब्द वापरला होता. आशिया कप 2023 चा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नुकत्याच झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही. जर ही स्पर्धा इतरत्र आयोजित केली गेली तर फक्त भारतीय संघच त्यात भाग घेईल.

हेही वाचा : WPL 2023 : मुंबई इंडियन्सचा लाजिरवाणा पराभव, दिल्लीची गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.