ETV Bharat / sports

IIND vs NZ Second Test 2nd day: केवळ 62 धावात न्यूझीलंड गारद, भारताची 332 धावांची आघाडी

author img

By

Published : Dec 4, 2021, 3:29 PM IST

Updated : Dec 4, 2021, 8:06 PM IST

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामन्याचा (India vs New Zealand 2nd Test) दुसरा दिवस वेगवान ठरत आहे. भारताने आपला पहिला डाव 325 धावावर ओटोपला. विशेष म्हणजे भारताचे 10 खेळाडू बाद करण्याचा पराक्रम एजाज पटेलने केला. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने आपल्या पहिल्या डावाला खराब सुरुवात केली.

भारताच्या पहिल्या डावात 325 धावा,
भारताच्या पहिल्या डावात 325 धावा,

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईत खेळल्या जात असलेल्या क्रिकेट कसोटी मालिकेच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण न्यूझीलंड संघ केवळ 62 धावात तंबूत परतला. यामुळे भारताला 263 धावांची आघाडी मिळाली होती.

भारताचा दुसरा डाव

भारताने दुसऱ्या डावाची सुरुवात मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांना सलामीला पाठवून केली. पहिल्या डावात पुजारा सलामीला खेळला नव्हता. त्याच्या जागी शुबमन गिलने भारताची सुरुवात केली होती. शुभमन गिलला पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना उजव्या कोपराला जबर मार लागला. तो पूर्णपणे बरा झालेला नाही आणि त्यामुळेच तो सलमीला फलंदाजीसाठी उतरला नाही. दुसऱ्या डावातही मयंक अग्रवालची बॅट तळपली. मयंकने नाबाद 38 धावा केल्या तर चेतेश्वर पुजारा 29 धावावर नाबाद राहिला. भारताने दुसऱ्या डावाची मजबूत पायाभरणी केली असून नाबाद 69 धावा दुसऱ्या डावात झाल्या आहेत. भारताने आता 332 धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताच्या विजयाचा मार्ग बऱ्यापैकी सुकर झाला आहे असे मानले जात आहे.

पत्त्याप्रमाणे कोसळला न्यूझीलंडचा पहिला डाव

न्यूझीलंड संघाच्या सलामीच्या फलंदाजीसाठी विल यंग आणि टॉम लेथम उतरले. मात्र फार काळ दोघांनाही मैदानावर टिकून राहाता आले नाही. दोघांनाही मोहम्मद सिराजसमोर शरणागती पत्करली. लेथम 10 आणि यंग 4 धावावर माघारी परतले. त्यानंतर डेरी मिशेल 8 धावा, रॉस टेलर 1 धाव, हेन्री निकोलस 7 धावा, रचिन रविंद्र 4 धावा काढून तंबूत परतले. त्यानंतर टॉम ब्लन्डेल 8 धावावर तर टीम सौदी खाते न उघडता माघरी परतले. केल जेमीसनने अखेरच्या क्षणी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु 17 धावावर त्याला अक्सर पटेलने माघारी धाडले. विल सोमर्विलेला आर अश्विनने खातेही उघडू दिले नाही. अशा तऱ्हेने न्यूझीलंड संघाचा डाव केवळ 62 धावावर आटोपला. यामुळे भारताला 263 धावांची आघाडी मिळाली आहे.

मोहम्मद सिराजने 3 गडी बाद केले, आर अश्विननेही 4 गडी बाद केले, तर अक्सर पटेलने 2 जयंत यादवने 1 गडी बाद केला.

भारताचा पहिला डाव

भारताने आपल्या पहिल्या डावाची सुरुवात 221 पासून पुढे सुरू केली. काल पहिल्या दिवसाच्या अखेरीस भारताचे 4 फलंदाज बाद झाले होते. वृध्दिमान साहाने केवळ 2 धावांची आज भर घातली व 27 धावावर तो माघारी परतला. मयंक अग्रवालने पुन्हा दमदार खेळी करीत 150 धावा केल्या. त्यानंतर अक्सर पटेलने मैदानावर टिकून राहात 52 धावांची नेत्रदीपक कामगिरी बजावली. आर अश्विनला आपले खाते उघडता आले नाही. जयंत यादव 12 धावा व सिराजने 4 धावा काढल्या. उमेश यादव धाव न काढता नाबाद राहिला. अशा तऱ्हेने भारताने आपला पहिला डाव 325 धावावर ओटोपला.

एका डावात १० बळी घेणारा तिसरा खेळाडू ठरला एजाज

कुंबळे आणि एजाज व्यतिरिक्त इंग्लंडच्या जिम लेकर यांनी हा विक्रम पहिल्यांदा रचला होता. कसोटीच्या एका डावात १० बळी घेण्याचा पराक्रम फिरकी गोलंदाजांनीच केला आहे. पण पहिल्यांदाच एखाद्या गोलंदाजाने घराबाहेर हा पराक्रम केला आहे. याआधी कुंबळे यांनी पाकिस्तानविरुद्ध आणि लेकर यांनी देखील घरच्या मैदानावर ही कामगिरी केली होती.

हेही वाचा - Ind Vs Sa : टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार, पण टी 20 मालिका स्थगित

Last Updated : Dec 4, 2021, 8:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.