ETV Bharat / sports

Asia Cup २०२३ : 'आयसीसी फक्‍त बकवास करते. यामुळे क्रिकेट...', श्रीलंकेचा विश्वविजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा भडकला

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 8:37 AM IST

Arjuna Ranatunga
अर्जुन रणतुंगा

Asia Cup २०२३ : श्रीलंकेचा विश्वविजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा यानं आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्याच्या निर्णयाबद्दल आयसीसी आणि एसीसीवर जोरदार टीका केली आहे. 'असं केल्यानं क्रिकेट धोक्यात येईल', असं तो म्हणाला.

कोलंबो Asia Cup २०२३ : आशिया चषक आता अंतिम टप्प्यात आला असून, रविवारी (१७ सप्टेंबर) अंतिम सामन्यात भारताचा मुकाबला श्रीलंकेशी आहे. मात्र हा आशिया चषक एका वेगळ्याचं कारणानं चर्चेत आलाय. आशिया चषक स्पर्धेत केवळ भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता. स्पर्धेतील अन्य कोणत्याही सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला नाही. विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामनाही राखीव दिवशी निकाली लागला. यामुळे नवा वाद निर्माण झालाय. जगभरातील आजी-माजी क्रिकेट खेळाडू, समालोचक तसेच क्रिकेट पंडित आयसीसीच्या या निर्णयावर कडाडून टीका करत आहेत.

..तर क्रिकेट धोक्यात येईल : आता श्रीलंकेचा माजी वर्ल्डकप विजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा यानं या मुद्यावरून आयसीसीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. 'एक किंवा दोन संघांच्या बाजूनं नियमांमध्ये बदल केल्यास क्रिकेट धोक्यात येईल', असं तो म्हणाला. 'तुम्ही आशिया कपचं आयोजन करा. मात्र आपल्याकडे स्पर्धेपूर्वी काही नियम बनवण्यात आले आहेत. त्या एका सामन्यापूर्वी (भारत विरुद्ध पाकिस्तान) त्यांनी नियम बदलले. एसीसी (Asian Cricket Council) कुठे आहे? आयसीसी (International Cricket Council) कुठे आहे?' असे प्रश्न रणतुंगा यानं विचारले.

  • There will be Reserve day have only India vs Pakistan match on 10th September and Final of this Asia Cup 2023. (To ESPNcricinfo) pic.twitter.com/sto6HFBwXh

    — CricketMAN2 (@ImTanujSingh) September 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यामुळे भविष्यात खूप नुकसान होणार : 'जेव्हा एखाद्या स्पर्धेत तुम्ही संघासाठी नियम बदलता तेव्हा मला फार राग येतो. यामुळे भविष्यात खूप नुकसान होणार आहे', असं तो म्हणाला, 'मला आयसीसी आणि एसीसीसाठी खूप वाईट वाटतं, कारण अधिकाऱ्यांना फक्त पदावर राहायचं आहे', असा आरोप रणतुंगा यानं केला. मात्र यामुळे कमाईवर परिणाम होऊ शकतो, यावर रणतुंगानं बोलणं टाळलं.

  • VIDEO | "ICC is a toothless tiger. They act very unprofessionally. I think they are the ones who should protect cricket," says Sri Lanka's World Cup winning captain Arjun Ranatunga. pic.twitter.com/RgkFPmBnzt

    — Press Trust of India (@PTI_News) September 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आयसीसी बकवास करते : पुढे बोलताना रणतुंगानं आयसीसीवर उपहासात्मक टीका केली. 'अहमदाबादमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान विश्वचषक सामन्याला राखीव दिवस मिळाला तर आश्चर्य वाटणार नाही', असं तो म्हणाला, 'भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी (वर्ल्ड कपमध्ये) त्यांनी नियम बदलल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. आयसीसी तोंड बंद ठेवेल आणि 'ठीक आहे, हे करा' असं म्हणेल. आयसीसी फक्‍त बकवास करते. तिच्या नियंत्रणात काहीच नाही', असे खडे बोलं रणतुंगानं सुनावले.

हेही वाचा :

  1. Ind Vs Ban Asia Cup : बांगलादेशचा भारतावर 6 धावांनी विजय, शुभमन गिलचं शतक व्यर्थ
  2. Gambhir on Dhoni : धोनीबाबत गौतम गंभीरचं आणखी एक मोठं वक्तव्य; म्हणाला, 'धोनीमुळे रोहित शर्मा...'
  3. Rohit Sharma Record: 'हिटमॅन'च्या वनडेत १०,००० धावा पूर्ण, सचिनचा 'हा' रेकॉर्ड मोडला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.