ETV Bharat / sitara

दोन महिने अलिप्त राहिल्यानंतर सोशल मीडियावर करण जोहरने लिहिली पोस्ट

author img

By

Published : Aug 15, 2020, 8:58 PM IST

सुशांतसिंह राजपूतच्या निधनाच्या दोन महिन्यांनंतर सोशल मीडियावर निर्माता करण जोहर यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पहिली पोस्ट लिहिली आहे. गेली दोन महिने तो सोशल मीडियापासून अलिप्त होता.

karan-johar-returns-to-social-media-
करण जोहरने लिहिली पोस्ट

मुंबईः अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या निधनानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर निर्माता करण जोहरने दोन महिन्यांनंतर स्वातंत्र्यदिनाच्या पोस्टने इंस्टाग्रामवर पुनरागमन केले.

करणने भारतीय राष्ट्रीय ध्वजाचा फोटो शेअर केला आणि लिहिले: "आपल्या महान राष्ट्राला .... संस्कृती, वारसा आणि इतिहासाचा खजिना आहे .... .... हॅपी इंडिपेंडेन्स डे ... जय हिंद".

जान्हवी कपूर आणि नेहा धुपिया यासारख्या अनेक कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना लाईक्स दिल्या आहेत आणि इमोजी टाकले आहेत. एका युजरने लिहिलंय, "परत येण्याचा महान दिवस."

करणने आपल्या पोस्टवर प्रतिक्रिया देण्यास बंदी केली आहे. करणने आपली पोस्ट ट्विटरवर ठेवलेली नाही.

14 जून रोजी सुशांतच्या मृत्यूनंतर करणने दिवंगत सुशांतसोबतचा स्वत: चा एक फोटो शेअर केला होता. त्याने सुशांतबद्दल भावनिक पोस्ट लिहिली होती. यामध्ये त्याने स्वतःला दोष दिला होता. त्यानंतर सोशल मीडियावरुन त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आले. इतकेच नाही तर त्याला जीवे मारण्याच्या, जुळ्या मुलांना मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर त्याने स्वतःला सोशल मीडियापासून अलिप्त ठेवले होते. या पार्श्वभूमीवर आज तो दोन महिन्यानंतर सोशल मीडियावर स्वातंत्र्य दिनाची पोस्ट घेऊन अवतरला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.