ETV Bharat / science-and-technology

Sustainable Development Goals : शाश्वत विकास उद्दिष्टे पूर्ण करण्यापासून हवामान बदलातील तापमान रोखू शकते भारताला

author img

By

Published : Apr 20, 2023, 3:01 PM IST

वाढत्या तापमानामुळे भारतातील शाश्वत विकासाला खिळ बसू शकत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. त्यामुळे आगामी विकासावर वाढत्या तापमानाचा फटका बसणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Sustainable Development Goals
संग्रहित छायाचित्र

कॅलिफोर्निया : भारतामध्ये उष्णतेच्या लाटा अधिक प्राणघातक होत आहेत. त्यामुळे आरोग्य, शेती आणि इतर सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रणालींवर ताण पडत आहे. त्यामुळे हवामान बदलामुळे वाढलेले तापमान भारताच्या शाश्वत विकासाच्या प्रगतीमध्ये अडथळा आणू शकतात असा दावा संशोधकांनी केला आहे. युनायटेड किंग्डम येथील केंब्रिज विद्यापीठाचे रमित देबनाथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा दावा केला आहे. याबाबतचे संशोधन पीएलओएस क्लायमेटमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी वचनबद्ध : भारताने शून्य गरिबी, चांगले आरोग्य आणि कल्याण, सभ्य काम आणि आर्थिक वाढ यासह संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांना (SDG) पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे. तथापि, सध्याच्या हवामान असुरक्षिततेचे मूल्यांकन SDG प्रगतीवर हवामान बदलामुळे विकास साध्य करण्यास अडचणी येऊ शकतात. संशोधकांनी भारताच्या उष्मा निर्देशांकाचे (HI) हवामान असुरक्षा निर्देशांकासह (CVI) विश्लेषणात्मक मूल्यमापन केले. भारताच्या हवामान असुरक्षिततेचे आणि हवामानातील बदलांचे विश्लेषण करण्यासाठी सामाजिक, आर्थिक, उपजीविका आणि जैवभौतिक घटकांसाठी विविध निर्देशकांचा वापर केला. या संशोधकांनी भारत सरकारच्या राष्ट्रीय डेटा आणि विश्लेषण प्लॅटफॉर्मवरील राज्यस्तरीय हवामान असुरक्षा निर्देशकांवर सार्वजनिकरित्या उपलब्ध डेटासेट वापरला. त्यानंतर संशोधकांनी 20 वर्षांच्या कालावधीत (2001-2021) SDG च्या दिशेने भारताच्या प्रगतीची तुलना केली.

तापमानाने विकास कमकुवत केल्याचा दावा : वाढत्या तापमानाने पूर्वीच्या अंदाजापेक्षा SDG प्रगती कमकुवत केली आहे. सध्याचे मूल्यांकन मेट्रिक्स हवामान बदलाच्या प्रभावांना भारताच्या असुरक्षिततेचे बारकावे पुरेशा प्रमाणात कॅप्चर करू शकत नाहीत. देशातील जवळपास 90 टक्के भाग उष्णतेच्या लाटेच्या प्रभावापासून धोक्याच्या क्षेत्रात असल्याचे या संशोधनात आढळून आले आहे. देशातील सुमारे 20 टक्के हवामान बदलासाठी अत्यंत असुरक्षित आहे. राष्ट्रीय राजधानीसाठीही असेच परिणाम दिसून आले. संपूर्ण दिल्ली उष्णतेच्या तीव्र परिणामांमुळे धोक्यात आली आहे. उष्णतेच्या लाटांमुळे CVI च्या आधीच्या अंदाजापेक्षा जास्त भारतीय राज्ये हवामान बदलासाठी असुरक्षित बनल्याचा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.

शाश्वत विकास होऊ शकते मंद : भारत आणि भारतीय उपखंडात उष्णतेच्या लाटा वारंवार आणि दीर्घकाळ टिकतात असाही दावा या संशोधनात करण्यात आला आहे. भारतात उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होत आहेत. त्यामुळे देशातील 80 टक्के नागरिक धोक्यात आहेत. सध्याच्या हवामान असुरक्षिततेच्या मूल्यांकनात बेहिशेबी राहिले आहे. जर या प्रभावाची त्वरित दखल घेतली गेली नाही, तर भारताची शाश्वततेकडे प्रगती मंद होऊ शकते असा दावाही या संशोधनात करण्यात आला आहे.

हेही वाचा - Elon Musk On Blue Tick Removed : आजपासून हटवण्यात येणार ट्विटर खात्यावरुन ब्लू टिक, मोजावे लागणार इतके पैसे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.