ETV Bharat / entertainment

Box Office Collection Day 4 : 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाने चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमी केली कमाई

author img

By

Published : Jun 6, 2023, 3:02 PM IST

विकी कौशल आणि सारा अली खान स्टारर चित्रपट 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाने चौथ्या दिवशी फार कमी बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. त्यामुळे चित्रपटाचे निर्माते फार नाराज झाले आहे.
बॉक्स ऑफिस कलेक्शन
Box Office Collection Day 4

मुंबई: अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान स्टारर 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर आदळला आहे. 'मिमी' फेम दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना या चित्रपटाबाबत फार अपेक्षा होती मात्र चौथ्या दिवशी या चित्रपटाने फार कमी कमाई केली नाही. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 5.50 कोटींची कमाई केली होती. मात्र आता पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षा चौथ्या दिवशी कमी कमाई झाल्याने या चित्रपटाचे निर्माते फार नाराज झाले आहे. चित्रपटाच्या चौथ्या दिवसाचे कलेक्शन हे चित्रपटाचा खर्चही वसूल करू शकणार नसल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे 40 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने चार दिवसांत 25 कोटींहून अधिक कमाविले आहे. मात्र चौथ्या दिवसाच्या कलेक्शनने निर्मात्यांना आश्चर्यचकित केले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

चौथ्या दिवसाची कमाई : मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने चौथ्या दिवशी केवळ 3.80 कोटी (अंदाज) कलेक्शन केले आहे. यानंतर चित्रपटाचे कलेक्शन 26.39 कोटी रुपये इतके झाले आहे. चौथ्या दिवशी थिएटरमध्ये प्रेक्षकांची संख्या 13.50 टक्के होती. 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट विक्की कौशलचा उरी - द सर्जिकल स्ट्राइक चित्रपटानंतरचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 2 जूनला रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 5.50 कोटी, दुसऱ्या दिवशी 7 कोटी, तिसऱ्या दिवशी 9 कोटींचा गल्ला जमवला. दुसरीकडे, चौथ्या दिवशी चित्रपटाने ३.८० ची कमाई केली आहे, असे दिसते की 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यात हळूहळू कमाई करेल.

चित्रपटाची कथा : विक्की कौशल (कपिल) आणि सारा अली खान (सौम्या) हे कॉलेज प्रेमी आहेत, जे नंतर लग्न करतात आणि आनंदाने स्थायिक होतात. त्याचवेळी, कपिल आणि सौम्या लग्नानंतरच्या क्षणांचा आनंद संयुक्त कुटुंबात उघडपणे घेऊ शकत नाहीत. संयुक्त कुटुंबात जोडप्याचा एकांत गुदमरतो. त्यांना कुटुंबांपासून दूर जाण्यासाठी, कपिल आणि सौम्या भारत सरकारचा प्रमुख कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजनाद्वारे फ्लॅट मिळवण्याचा प्रयत्न करतात. घर मिळवण्यासाठी ते घटस्फोट घेण्याचे नाटकही करतात, अशी या चित्रपटाची कहाणी आहे. हा चित्रपट फार मनोरंजक आहे.

हेही वाचा :

  1. Khurana hold their mothers hands : वडिलांच्या मृत्यूनंतर आयुष्मान आणि अपारशक्ती आईसोबत मुंबईत दाखल
  2. Kartik Aaryan : 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाने उडली कार्तिक आर्यनची झोप
  3. Prabhas visits Tirupati Balaji temple : आदिपुरुष प्री-रिलीज इव्हेंट पूर्वी प्रभासची तिरुपती बालाजी मंदिराला भेट
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.