ETV Bharat / city

Raju Shetty Criticism on Sharad Pawar : शेतकऱ्यांनी शेती करावी की कारखाना ताब्यात घ्यावा - राजू शेट्टी

author img

By

Published : Apr 18, 2022, 8:28 PM IST

वर्षानुवर्षे शेतकरी गुलामीचे जीवन जगत आहेत. आज सर्वच उत्पादनाचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या शेती मालाचा दर वाढताना दिसत नाही, अशी खंत व्यक्त करत देशातील 300 शेतकरी संघटना एकत्र येऊन हमीभावासाठी लढणार असून प्रसंगी न्यायालयात जाण्याचा एल्गार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे.

राजू शेट्टी
राजू शेट्टी

सोलापूर - उसाची लागवड केल्यानंतर ऊस कारखान्यात जाईपर्यंत कर्ज काढण्यापासून बिल येईपर्यंत शेतकऱ्यांना मिळेपर्यंत शेतकऱ्यांना किती कष्ट करावे लागतात. याबाबत स्पष्टीकरण देत शेतकऱ्यांनी शेती करावी की कारखाना ताब्यात घ्यावा याचा सल्ला शरद पवारांनी ( Sharad Pawar ) द्यावा, अशी टीका राजू शेट्टी यांनी शरद पवारांवर केली ( Raju Shetty Criticism on Sharad Pawar ) आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची हुंकार बळीराजाचा ही यात्रा सोलापूर येथे आल्यावर राजू शेट्टी यांनी सात रस्ता येथे शासकीय विश्राम गृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काही मिनिटांतच ऊस शेतीबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच याच ऊस शेतकऱ्यांपासून साखर कारखाने चालतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

बोलताना राजू शेट्टी

प्रसंगी न्यायालयात जाऊ - वर्षानुवर्षे शेतकरी गुलामीचे जीवन जगत आहेत. आज सर्वच उत्पादनाचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या शेती मालाचा दर वाढताना दिसत नाही, अशी खंत व्यक्त करत देशातील 300 शेतकरी संघटना एकत्र येऊन हमीभावासाठी लढणार असून प्रसंगी न्यायालयात जाण्याचा एल्गार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला ( Raju Shetty ) आहे.

बळीराजा हुंकार यात्रेतून शेतकऱ्यांना देणार न्याय - बळीराजा हुंकार माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून जीवाचे रान करणार. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी लढा देणार, हमीभाव कायदा व्हावा यासाठी लढू, असे राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.

हेही वाचा - Raju Shetty : भोंगे जरूर वाजवा मात्र, आधी शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या : राजू शेट्टी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.