ETV Bharat / city

केंद्रीय सहकार मंत्र्यामुळे राज्यातील सहकार नीट होणार - पाशा पटेल

author img

By

Published : Aug 28, 2021, 8:09 PM IST

नवीन कायद्यानुसार, शेतकऱ्यांच्या शेतातील शेवटचे कण असेपर्यंत शेती मालाला 'एमएसपी'नुसार हमीभाव देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. 2014 पूर्वीच्या तिप्पट खरेदी केंद्र सरकार करत असल्याचे माजी आमदार पाशा पटेल यांनी सांगितले.

c
c

सोलापूर - केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे सध्या केंद्रीय सहकार मंत्रीपदही आहे. आता सहकार क्षेत्रातील सर्व सहकार नीट झाल्या शिवाय राहणार नाही, ही काळ्या दगडा वरची पांढरी रेघ आहे, असे वक्तव्य माजी आमदार पाशा पटेल यांनी केले आहे. बांबू शेतीच्या मेळाव्यासाठी पाशा पटेल हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यांच्यासोबत आमदर सुभाष देशमुखही उपस्थित होते. मंद्रुप येथे मेळाव्यात मार्गदर्शन करून पाशा पटेल आणि सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे राज्य सरकारवर टीका केली.

बोलताना पाशा पटेल

शेतकऱ्यांच्या शेतातील शेवटचे कण असेपर्यंत सरकार हमी घेते

केंद्र सरकारने 2020 मध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी कायदा पारित केला आहे. यावर पाशा पटेल यांनी म्हणाले, केंद्र सरकार या कायद्यानुसार शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचा प्रयत्न करत आहे. नवीन कायद्यानुसार, शेतकऱ्यांच्या शेतातील शेवटचे कण असेपर्यंत शेती मालाला 'एमएसपी'नुसार हमीभाव देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. 2014 पूर्वीच्या तिप्पट खरेदी केंद्र सरकार करत असल्याचे माजी आमदार पाशा पटेल यांनी सांगितले.

बांबू शेतीचा मोठा फायदा

कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार पाशा पटेल हे शनिवारी (28 ऑगस्ट) सोलापूर दौऱ्यावर आले होते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे त्यांनी बांबू मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कारण मंद्रुप हे गाव नदीकाठी वसले आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांनी अनेक दिवसांपासून नदी किनारी उसाची शेती करून जमीन नापीक झाल्या आहेत. येथे बांबूची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल, असे पाशा पटेल म्हणाले.

हेही वाचा - महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख यांचे निधन;लाल मातीवर शोककळा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.