ETV Bharat / city

Nana Patole Letter To CM : नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कॉमन मिनिमम प्रोग्राममधील मुद्यांना वेग देण्याची केली मागणी

author img

By

Published : Mar 30, 2022, 5:37 PM IST

Updated : Mar 30, 2022, 6:21 PM IST

महाविकास आघाडी सरकार ( Mahavikas Aghadi government ) स्थापन करताना तयार करण्यात आलेल्या कॉमन मिनीमन प्रोग्राम ( Common Minimum Programme ) तयार करण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी नाना पटोलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे.

नाना पटोले
नाना पटोले

पुणे - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी महाविकास आघाडी सरकार ( Mahavikas Aghadi government ) स्थापन करताना तयार करण्यात आलेल्या कॉमन मिनीमन प्रोग्राम ( Common Minimum Programme ) तयार करण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, असे यावेळी नाना पटोले यांनी म्हटले आहे. पुण्यात काँग्रेस भवन येथे नाना पटोले एका कार्यक्रमा निमित्त आले होते यावेळी ते बोलत होते.

प्रतिक्रिया देताना नाना पटोले

'...म्हणून महाविकास आघाडी सरकार आले' : राज्यात पहाटेच सरकार जेव्हा पडले, तेव्हा राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून काँग्रेस नेते सोनिया गांधी यांना एकत्र सरकारबाबत पाठविण्यात आले. त्यानंतर सोनिया गांधी यांनी कॉमन मिनिमम प्रोग्राम दिले होते. राज्यात महाविकास आघाडीची सरकार आली. पण 2 वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नागरिकांच्या आरोग्यासाठी काम केले आणि इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात दुःखद घटना कमी झाल्या. या काळात सरकार स्थापन करताना जो कॉमन मिनिमम प्रोग्राममधील काही मुद्दे राहिले आहे. ते सगळे मुद्दे आत्ता सरकारच्यावतीने राबविण्यात याव्या, यासाठी काँग्रेस पक्ष्याच्यावतीने मुख्यमंत्र्यांना मागणी करण्यात आली आहे. जे मुद्दे राहिले आहे त्यांना लवकरात लवकर वेग द्यावे, असे पटोले म्हणाले.

'युपीएच नेतृत्व काँग्रेसच करेल': युपीएचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे, असा ठराव राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केले आहे. यावर पटोले यांना विचारले असता ते म्हणाले, की त्यांच्या पक्षात काय ठराव करावे हे त्यांच्या पक्षाचा विषय आहे. पण देशात भाजपाला पर्याय हा काँग्रेसच आहे. युपीएच नेतृत्व काँग्रेसच करेल. ज्याला जे ठराव करायचे आहे ते त्याने करावे, असे यावेळी पटोले म्हणाले. सोनिया गांधी हे आमच्या नेत्या आहे. त्यांना भेटायला आमचे आमदार जाणार आहे. यात गैर काय. आमचे आमदार आमच्या नेत्यांना भेटायला जाणार आहे. त्यात विरोधकांना एवढे विरोध करायची काय गरज आहे. राज्यात काँग्रेसला बळकटी कशी येणार यावर चर्चा करणार आहे, अस देखील यावेळी पटोले म्हणाले.


'तेव्हा केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर स्थिर ठेवले': खोटी सरकार या देशात आली आहे. 2014 पासून खोटे बोलत हे सरकार देशातील नागरिकांना मूर्ख बनविण्याच काम करत आहे. जेव्हा देशात 5 राज्यांच्या निवडणुका होत्या तेव्हा केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर स्थिर ठेवले. पण जशा निवडणूक झाल्या तसे पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करायला सुरुवात केली. 140 दिवसानंतर असे कोणते भूकंप देशात आले की लगेच पेट्रोल डिझेलच्या किमती वाढायला लागल्या, असा सवाल देखील यावेळी नाना पटोले यांनी केले आहे.

हेही वाचा - Nanar Refinery Project : प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये याची काळजी घ्यावी; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

Last Updated : Mar 30, 2022, 6:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.