ETV Bharat / city

High Court Rejects Petition Against Ganpati processions pune पुण्यातील मानाच्या गणपती मिरवणुकींविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली!

author img

By

Published : Sep 6, 2022, 3:35 PM IST

पुण्यातल्या मानाच्या गणपतींच्या (pune ganesh festival) विसर्जन मिरवणुकींवरून (Ganpati processions in Pune) सुरु झालेल्या वादावरील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून (High Court Rejects Petition) लावली आहे. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली. पुण्यात मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक झाल्यानंतर अन्य मंडळांना विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगी देण्याच्या परंपरेला यावेळी बढाई समाज ट्रस्टचे (Badhai Samaj Trust) अध्यक्ष शैलेश बढाई (Shailesh Badhai petition) यांनी ऍडवोकेट असीम सरोदे (adv aseem sarode) यांच्या मार्फत उच्च न्यायालायात आव्हान दिलं होतं. या अटी आणि परंपरा संविधानातील कलम 19 नुसार असलेल्या स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे असा दावा त्यांनी केला होता. मानाच्या गणपतीआधी छोट्या मंडळांना विसर्जन मिरवणुकांची परवानगी द्यावी अशी त्यांची मागणी होती. मात्र, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

pune ganesh
पुणे गणेश

मुंबई पुण्यातल्या मानाच्या गणपतींच्या (pune ganesh festival) विसर्जन मिरवणुकींवरून (Ganpati processions in Pune) सुरु झालेल्या वादावरील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून (High Court Rejects Petition) लावली आहे. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली. पुण्यात मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक झाल्यानंतर अन्य मंडळांना विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगी देण्याच्या परंपरेला यावेळी बढाई समाज ट्रस्टचे (Badhai Samaj Trust) अध्यक्ष शैलेश बढाई (Shailesh Badhai petition) यांनी ऍडवोकेट असीम सरोदे (adv aseem sarode) यांच्या मार्फत उच्च न्यायालायात आव्हान दिलं होतं. या अटी आणि परंपरा संविधानातील कलम 19 नुसार असलेल्या स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे असा दावा त्यांनी केला होता. मानाच्या गणपतीआधी छोट्या मंडळांना विसर्जन मिरवणुकांची परवानगी द्यावी अशी त्यांची मागणी होती. मात्र, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक (Ganpati processions in Pune) ही राज्यभरातील भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र असतं. पुण्यातील हजारो मंडळं सुंदर असे विसर्जन रथ तयार करून त्यावर गणपती बाप्पाला ठेऊन मिरवणुकीत सहभागी होतात. मात्र सकाळी दहा वाजता सुरु झालेल्या या मिरवणुकीत मानाच्या पाच गणपतींचं विसर्जन होता होता दिवस संपून जातो. त्यामुळं इतर हजारो मंडळांना ताटकळत राहावं लागतं. पोलीस आणि प्रशासनाकडे याबाबत अनेकदा दाद मागून देखील दखल न घेतली गेल्यानं पुण्यातील गणेश मंडळांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

ऍडव्होकेट असीम सरोदे

दरम्यान, पुण्यातील विसर्जन मिरवणुकीच्या या वादाला मोठा इतिहास आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केल्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे 1894 ला पुण्यातील गणेश मंडळांमध्ये आधी विसर्जन कोणी करायचं यावरून वाद निर्माण झाला. हा वाद लोकमान्य टिळकांपर्यंत पोहचल्यावर पुण्याचं ग्रामदैवत म्हणून विसर्जनाचा पहिला मान कसबा गणपतीला (kasaba ganpati) पुण्याची ग्रामदेवता म्हणून दुसरा मान तांबडी जोगेश्वरीला राहील असं ठरलं. पुढे तिसरा मान गुरुजी तालीम चौथा मान तुळशीबाग आणि पाचवा मान केसरीवाडा या गणेश मंडळांना राहील अशी प्रथा रूढ झाली.

हेही वाचा अल्लू अर्जुन आणि मुलगी अर्हा यांनी दिला बाप्पाला निरोप - पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.