ETV Bharat / city

Pimpari Chinchwad Crime : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या 'गुन्हेगारी मुक्त पिंपरी-चिंचवड' संकल्पनेला तडा?

author img

By

Published : Dec 20, 2021, 3:39 PM IST

Updated : Dec 20, 2021, 4:30 PM IST

एका तडीपार गुंडाने वर्दळीच्या ठिकाणी सराईत गुन्हेगारावर बेछूट गोळीबार ( Pimpari Chinchwad Firing ) केल्याची घटना पिंपरी चिंचवडच्या काटे पुरम चौकात ( Katepuram Chauk Firing ) घडली आहे. या गोळीबारात सराईत गुन्हेगाराचा ( Pimpari Chinchwad Firing Death ) मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलीस आयुक्तांची भीती गुन्हेगारांमध्ये राहिली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Pimpari Chinchwad Firing
Pimpari Chinchwad Firing

पुणे - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी कृष्णप्रकाश ( Pimpari Chinchwad CP Krushna Prakash ) हे विराजमान होताच, चुकीचं वागल्यास राजकारण्यांची गय केली जाणार नाही. पिंपरी-चिंचवड हे गुन्हेगारी मुक्त आणि भयमुक्त करणार असल्याचा संकल्प त्यांनी केला होता. मात्र, त्यांचा या संकल्पनेला तडा गेल्याचे शनिवारी पाहायला मिळाले. एका तडीपार गुंडाने वर्दळीच्या ठिकाणी सराईत गुन्हेगारावर बेछूट गोळीबार ( Pimpari Chinchwad Firing ) केल्याची घटना पिंपरी चिंचवडच्या काटे पुरम चौकात (Katepuram Chauk Firing ) घडली. या गोळीबारात सराईत गुन्हेगाराचा ( Death In Pimpari Chinchwad Firing) मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलीस आयुक्तांची भीती गुन्हेगारांमध्ये राहिली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

घटना
  • पोलीस आयुक्तांची घटनास्थळी भेट -

शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास तडीपार गुंड गणेश मोटे, आश्विन चव्हाण या दोघांनी फिल्मीस्टाईलने भर चौकात वर्दळीच्या ठिकाणी योगेश राजेंद्र जगताप याच्यावर तब्बल दहा गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती. यातील आरोपी गणेश मोटे हा तडीपार होता. त्यामुळे सांगवी पोलिसांच्या कामगिरीवरदेखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या घटनेतील दोन्ही आरोपी फरार आहेत. दरम्यान, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घटनास्थळी भेट दिली.

  • वर्दळीच्या ठिकाणी गोळीबार -

काटे पुरम चौकात नेहमी वर्दळ असते, शनिवारी दत्त जयंती असल्याने अनेक भाविक त्या ठिकाणी येत होते. अशा वेळी नागरिकांनी गजबजलेल्या ठिकाणी योगेश जगतापची हत्या करून तडीपार गुंड गणेश मोटे याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. एकीकडे शहरात वाहनांची तोडफोड होत आहे. पिंपरीतील खराळवाडी परिसरात चार दिवसांपूर्वी 6-7 वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी गुंडांच्या भीतीने नागरिक तक्रार देण्यास तयार नव्हते. त्यामुळे शहरात घडत असलेल्या सततच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

  • वरिष्ठ अधिकारी पोलीस आयुक्तांचे ऐकत नाहीत? -

पिंपरी-चिंचवड शहरातील तडीपार गुंडावर लक्ष ठेवणे त्या-त्या परिसरातील पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचे काम आहे. मात्र, पोलीस आयुक्तांनी केलेल्या सुचनांना अनेक जण केराची टोपली दाखवत आहेत. पोलीस आयुक्तांची बदली केव्हा होणार, याकडेच सर्वांचे लक्ष आहे. पोलिसांमध्ये देखील गटबाजी असल्याचे वारंवार पुढे आले आहे. पोलीस आयुक्तांचे मर्जीतील अधिकाऱ्यांकडे जास्त लक्ष असते, अस अनेक पोलीस अधिकाऱ्यांमध्ये कुजबुज आहे. त्यामुळे हे सर्व बाजूला करून गुन्हेगारांच्या मुसक्या कशा आवळता येतील. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

  • गुन्हेगारांना पोलिसांचा वचक नाही -

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले की, भयमुक्त आणि गुन्हेगारीमुक्त पिंपरी-चिंचवड शहर करणार, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले होते. पहिल्या काही महिन्यात त्यांनी चांगले काम केले. सध्या, गुन्हेगारावरील त्यांची पकड सुटलेली दिसत आहे. पुन्हा गुन्हेगारी डोकेवर काढत असून हत्या, वाहनांची तोडफोड, गुन्हेगारांची दहशत ही प्रकरणं वाढली आहेत. नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत, नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. तक्रार दिल्यास त्यांचा कुटुंबाला त्रास होईल, ही भीती त्यांच्या मनात असते. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची भीती गुन्हेगारांमध्ये राहिली नाही. त्यांनी पहिल्या 5- 6 महिन्यात धडाकेबाज सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र गुन्हेगारी डोके वर काढत आहे. बेकायदेशीर पिस्तूल कुठून येतात, कोणाला दिली जातात हे सर्व पोलिसांना माहीत असते. यावर पायबंद आणण्याची पोलिसांची इच्छाशक्ती नाही, अशी प्रतिक्रिया भापकर यांनी दिली आहे.

हेही वाचा - Year in Review 2021 : मुंबईतील गुन्हेगारी जगतातील महत्वाच्या घडामोडींचा आढावा...

Last Updated : Dec 20, 2021, 4:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.