ETV Bharat / city

Defense Minister Rajnath Singh : 'आमचे राजकारण सरकार स्थापनेसाठी नव्हे, तर देशाच्या निर्माणासाठी'

author img

By

Published : May 20, 2022, 7:22 PM IST

Updated : May 21, 2022, 7:10 AM IST

Defense Minister Rajnath Singh
Defense Minister Rajnath Singh

भाजपा पक्ष ( BJP party ) हे सरकार बनविण्यासाठी राजकारण करत नाही, तर देश बनवण्यासाठी राजकारण करत आहे. असे विधान देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ( Defense Minister Rajnath Singh ) यांनी केले आहे. ते पुण्यात विद्यापीठ दीक्षांत समारंभात ( University Convocation Ceremony Pune ) बोलत होते.

पुणे - आज भारत हा जगातील सर्वाधिक वेगवान प्रगतिशील देश म्हणून अर्थव्यवस्थेत उभा आहे ही काही छोटी गोष्ट नाही. भारत स्वतंत्र झाला परंतू भारतातील गरिब स्थिती सुधारली नाही आणि म्हणूनच 2022 पर्यंत सर्वांना घर देण्याचा, तसेच प्रत्येक घरात शौचालय, पाणी या मूलभूत सुविधा देण्यावर आमचा कल आहे. भाजपा पक्ष ( BJP party ) हे सरकार बनविण्यासाठी राजकारण करत नाही, तर देश बनवण्यासाठी राजकारण करत आहे. असे विधान देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ( Defense Minister Rajnath Singh ) यांनी केले आहे. ते पुण्यात विद्यापीठ दीक्षांत समारंभात ( University Convocation Ceremony Pune ) बोलत होते.


या पुढे शहरात गावात असे एक घर नाही राहणार जिथे पाणी नाही, असा आमचा संकल्प आहे, असेही सिंह म्हणाले. आज भारतात 35 करोड बँक खाती आम्ही जनधन योजनेचे अंतर्गत यशस्वीपणे सुरू केली आणि जेव्हा त्या खात्यामध्ये 100 रुपये दिल्लीतून जात असतील तर तेवढेच पैसे गावातील व्यक्तीला मिळतात. 1 रुपयाचा देखील भष्ट्राचार होत नाही, असे या कार्यक्रम प्रसंगी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. शिवाय देशातील विविध विकासाच्या मुद्यावरही त्यांनी भाष्य केले.

  • Indo-China face-off, won't say much on it. The way our army had shown courage & worked charismatically, I will only say that if complete information could be given, every Indian's chest would swell with pride: Defence Minister Rajnath Singh (20.05) pic.twitter.com/OE7UYH7xHH

    — ANI (@ANI) May 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">


चीनसंदर्भात जास्त बोलणे टाळले - भारत-चीन आमनेसामने, यावर फार काही बोलणार नाही. आमच्या सैन्याने ज्याप्रकारे धैर्य दाखवले आणि करिष्माने काम केले, मी एवढेच म्हणेन की संपूर्ण माहिती दिली तर प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून येईल, असेही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा - Air India Emergency Landing : उड्डाणानंतर एअर इंडियाच्या विमानाचे इंजिन हवेतच बंद, आपत्कालीन परिस्थितीत जमिनीवर उतरविले विमान

Last Updated :May 21, 2022, 7:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.