ETV Bharat / city

Sanjay Raut Criticized MNS : 'ज्यांनी भाड्याने हिंदुत्व स्वीकारलं त्यांनी आम्हाल‍ा शिकवू नये', राऊतांचा मनसेला टोला

author img

By

Published : Apr 16, 2022, 3:55 PM IST

Updated : Apr 16, 2022, 4:52 PM IST

नाशिक दौर्‍याच्या दुसर्‍या ( Sanjay Raut In Nashik ) दिवशी शनिवारी हाॅटेल 'एक्सप्रेस इन' येथे पत्रकार परिषद घेत संजय राऊत ( Sanjay Raut PC In Nashik ) यांनी मनसेवर ( Sanjay Raut Criticized MNS ) हल्लाबोल केला. हिजाब मुद्दा संपल्यावर भोंग्याचे मुद्दा काढला. शिवसेनेने सन १९८७ साली विले पार्ले पोटनिवडणुकीत हिंदुत्वाची घोषणा केली. त्याचाच कॉपी करण्याचा पर्यंत केला, अशी टीका ही संजय राऊत यांनी केली.

Sanjay Raut Criticized MNS
Sanjay Raut Criticized MNS Criticized MNS

नाशिक - रामनवमीला दहा राज्यात दंगली ( Hindu Muslim Riot In India ) झाल्या. या पूर्वी रामनवमीला कधी दंगली झाल्या नव्हत्या. कोल्हापूर प्रचार ( Kolhapur By Election ) शिगेला पोहचला, तेंव्हाच भोंगे, हनुमान चालिसा ( Hanuman Chalisa ) हे घाणेरडं राजकारण सुरू करुन तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा कोणताही फायदा झाला नाही. राज्यात दंगली घडवायच्या आणि निवडणुका जिंकायच्या, असे कटकारस्थान सुरु असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut Criticized Bjp ) यांनी भाजपावर केला. तसेच ज्यांनी भाड्याने हिंदुत्व स्वीकारलं त्यांनी आम्हाल‍ा शिकवू नये, असा टोलाही त्यांनी मनसेला ( Sanjay Raut Criticized MNS ) लगावला. नाशिक दौर्‍याच्या दुसर्‍या ( Sanjay Raut In Nashik ) दिवशी शनिवारी हाॅटेल 'एक्सप्रेस इन' येथे पत्रकार परिषद घेत संजय राऊत ( Sanjay Raut PC In Nashik ) यांनी मनसेवर हल्लाबोल केला. हिजाब मुद्दा संपल्यावर भोंग्याचे मुद्दा काढला. शिवसेनेने सन १९८७ साली विले पार्ले पोटनिवडणुकीत हिंदुत्वाची घोषणा केली. त्याचाच कॉपी करण्याचा पर्यंत केला, अशी टीका ही संजय राऊत यांनी केली.

'भोंग्याच राजकारण संपल आहे' - ज्यांनी भाड्याने हिंदुत्व स्विकारलं, त्यांनी आम्हाल‍ा शिकवू नये, असा टोला त्यांनी मनसेला लगावला. हिजाब मुद्दा संपल्यावर भोंग्याचे मुद्दे काढले आहेत. भक्त असाल तर पुस्तकात डोकं घालून हनुमान चालीसा पठन करु नका. एवढेच आपण हनुमानाचे भक्त असाल, तर हनुमान चालीसा तोंडी पाठ असायला पाहिजे होती, असा टोलाही त्यांनी मनसेला लगावला.

आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार - आदित्य ठाकरे मे महिन्यात आयोध्येला जाणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा दौरा होण्याची शक्यता आहे. देशात रामराज्य यावं, यासाठी आशीर्वाद घ्यायला ते जाणार आहेत. आयोध्येला कोणीही जावं फक्त निर्मळ मनाने जावं राजकारण घेऊ जाऊ नये. आम्ही नेहमी जातो. बाबरी ढाचा पाडण्यापासून ते राम मंदिर कळस लावण्यापर्यंत आम्ही जातो आहे, असेही ते म्हणाले.

'भोंगा वाजला नाही, वाजणार नाही' - दरम्यान, काळारामाचे दर्शन घेण्यापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकरांना कोल्हापूरच्या मतमोजणीवर प्रतिक्रिया दिली. कोल्हापूर पोटनिवडणूक ( Kolhapur by election ) जिंकण्यासाठी या काळात भोंगा हे प्रकरण आणलं गेलं. पण त्यांचा भोंगा वाजला नाही. वाजणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. तसेच सामना मुखपत्रातील अग्रलेखावरुन मनसेने इशार दिला होता. याबाबत बोलताना त्यांनी 'जाता जाता दिला इशारा' हा चित्रपट पहावा, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.

हेही वाचा - Kolhapur North By Election Result : चंद्रकांत पाटील यांना आता पश्चात्ताप होत असेल; विजयानंतर जयश्री जाधव यांची प्रतिक्रिया

Last Updated : Apr 16, 2022, 4:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.