ETV Bharat / city

OBC Political Reservation : आरक्षणाच्या श्रेयवादावरुन विजय वडेट्टीवारांची शिंदे सरकारवर टीका; म्हणाले...

author img

By

Published : Jul 21, 2022, 5:23 PM IST

Updated : Jul 21, 2022, 5:35 PM IST

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar

अद्यापही नवीन सरकारचे मंत्रिमंडळ स्थापन झालेले नाही, तरी देखील ओबीसी समाजाच्या ( OBC Political Reservation ) राजकीय आरक्षणाचे श्रेय घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दावा करत आहेत. न्यायालयात वकील आम्ही नेमले, आयोगाचा अहवाल आम्ही सत्तेत असताना आला. तर मग हे सरकार आमच्या मेहनतीचे श्रेय कसे घेऊ शकते, असा प्रश्न माजी ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार ( Former OBC Minister Vijay Wadettiwar ) यांनी विचारला आहे.

नागपूर - राज्यात नवे सरकार स्थापन होऊन केवळ 15 दिवस झाले आहेत. अद्यापही नवीन सरकारचे मंत्रिमंडळ स्थापन झालेले नाही, तरी देखील ओबीसी समाजाच्या ( OBC Political Reservation ) राजकीय आरक्षणाचे श्रेय घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दावा करत आहेत. यावर माजी ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. बांठीया आयोग आमच्या सरकारने नेमला होता. आयोगाला ट्रिपल टेस्ट करण्याचे निर्देश आमच्या सरकारने दिले, न्यायालयात वकील आम्ही नेमले, आयोगाचा अहवाल आम्ही सत्तेत असताना आला. तर मग हे सरकार आमच्या मेहनतीचे श्रेय कसे घेऊ शकते, असा प्रश्न माजी ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार ( Former OBC Minister Vijay Wadettiwar ) यांनी विचारला आहे.

प्रतिक्रिया देताना माजी मंत्री विजय वडेट्टीवार

ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण बहाल झाल्यानंतर आता श्रेयवादाची लढाई चांगलीच रंगल्याचे बघायला मिळत आहे. तत्कालीन राज्यकर्ते जे आता विरोधी बाकावर बसलेले आहेत. त्यांनी याचे श्रेय आमच्या सरकारचे आहे, असा दावा केला आहे. तर नुकतेच सत्तेत आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर नव्या सरकारच्या पायगुणामुळे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळाले असल्याचा दावा केला आहे. यावर माजी ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला आहे.


'श्रेय कुणाचे हे जनतेला ठाऊक' : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात येऊन केवळ 15 दिवस झाले आहेत. मात्र, बांठीया आयोगाचा अहवाल आमच्या सरकारला प्राप्त झाला होता. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने फार मेहनत घेतली आहे. त्यामुळे या कामाचे श्रेय कुणाचे हे जनतेला माहीत असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

हेही वाचा - BMC Election : ओबीसी आरक्षणामुळे पुन्हा नव्याने लॉटरी, वंचितांना मिळणार पुन्हा एकदा संधी

Last Updated :Jul 21, 2022, 5:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.