ETV Bharat / city

सुखद लोकल प्रवास : डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार ठाणे-दिवा पाचवा-सहावा मार्ग

author img

By

Published : Oct 21, 2021, 5:36 PM IST

मुंबईकरांचा लोकलचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होण्यासाठी मुंबई शहर वाहतूक प्रकल्प-2 (एमयूटीपी)मध्ये ठाणे ते दिव्याच्या मार्गिकेचा समावेश आहे. मात्र, त्यात अडथळे येत गेल्याने अजूनही हा प्रकल्प रखडत होता. आता ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या प्रकल्पांना २००८साली मंजुरी मिळाली.

thane diva local
thane diva local

मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांनी रखडलेल्या ठाणे-दिवा पाचव्या सहाव्या रेल्वे मार्गाचे काम पूर्णत्वास येत आहे. ब्लॉक घेउन ठाणे आणि दिवा स्थानकाच्या दिशेला रूळ जोडण्याचे काम डिसेंबर महिन्याअखेर पूर्ण करण्यात येणार आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या पीक अवरच्या गर्दीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.

रेल्वे प्रवास होणार सुकर

मुंबईकरांचा लोकलचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होण्यासाठी मुंबई शहर वाहतूक प्रकल्प-2 (एमयूटीपी)मध्ये ठाणे ते दिव्याच्या मार्गिकेचा समावेश आहे. मात्र, त्यात अडथळे येत गेल्याने अजूनही हा प्रकल्प रखडत होता. आता ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या प्रकल्पांना २००८साली मंजुरी मिळाली. तरीही निधी, जागेचे नियोजन, नागरिकांचे पुनर्वसन अशा अनेक कारणांमुळे वर्षानुवर्षे प्रकल्प रखडला. तर, प्रकल्पांच्या कामांनी मार्च २०२१मध्ये वेग धरला होता. यापैकी ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या सहाव्या रेल्वे मार्गाचा प्रकल्प विविध कारणांनी रखडला. या प्रकल्पातील रुळाचे काम गेल्या एप्रिल महिन्यात पूर्ण होऊन ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार होती. २३ मार्चपासून कोरोनामुळे प्रकल्पाचे काम थांबले. अनलॉकमध्ये या मार्गाच्या कामाला वेग दिला. ठाणे ते दिवा दरम्यानच्या पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मुंब्रा येथे खाडीवर पूल बसविला आहे. आता दोन्ही दिशेला रुळांची जाेडणी करण्यासाठी मध्य रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येत आहे. हा ब्लॉक ४८ किंवा ७२ तासांचा आहे.

५०२ कोटी रुपये खर्च

हा मार्ग सुमारे ९.८ किमीचा असून २०१९पर्यंत ही मार्गिका पूर्ण होणार होती. २०२०-२१पर्यंतही मार्गिका पूर्ण होणार, असा दावा करण्यात आला आहे. या मार्गिकेमुळे मेल/एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका मिळणार असल्याने लोकल वाहतुकीतील अडचणी दूर होण्यास मदत होईल. याप्रकल्पाची अगोदरची डेडलाइन डिसेंबर २०१७ची होती. पण त्यास विविध कारणांनी विलंब झाला आहे. दरम्यान, ठाणे ते दिव्यातील पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर या पट्ट्यात सुमारे जादा १०० फेऱ्या चालविल्या जाउ शकतात, असा अंदाज आहे. या ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिका या प्रकल्पासाठी अंदाजित खर्च १४० कोटी रुपये होता. मात्र प्रकल्प रखडल्याने सुमारे ५०२ कोटी रुपये खर्च लागला आहे

प्रकल्पाचे वैशिष्ट्य

सध्या कुर्ला ते ठाणे आणि दिवा ते कल्याण दरम्यान पाचवा-सहावा मार्ग कार्यरत आहे. ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या - सहाव्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यास उपनगरीय रेल्वे आणि लांब पल्याच्या गाड्यांची वाहतूक वेगवेगळ्या रेल्वे ट्रॅकवरून करणे सोयीचे होणार आहे. ठाणे ते दिवादरम्यान टाकण्यात येत असलेला पाचच्या-सहावा रेल्वे मार्ग हा ठाणे ते दिवा दरम्यानच्या धिम्या मार्गाला जोडून आले. हा मार्ग नंतर जलद गाड्यांसाठी वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पातील मुंब्राजवळ दीड किलोमीटरचा उन्नत मार्ग, रुळांसह अन्य तांत्रिक कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.