ETV Bharat / city

Palghar Sadhu Murder Case : पालघरमधील साधू हत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे; मृतकांच्या नातेवाईकांना न्यायाची अपेक्षा

author img

By

Published : Oct 11, 2022, 8:04 PM IST

२०२० मध्ये महाराष्ट्रातील पालघरमध्ये दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरला लोकांच्या संतप्त जमावाने बेदम मारहाण केली (Sadhu Beating and Killing Palghar) होती. त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकार कायदा व सुव्यवस्थेबाबत भाजप आणि संतांच्या निशाण्यावर आले होते. आता या प्रकरणी एक मोठे अपडेट समोर आले आहे. पालघरमधील साधूंच्या मॉब लिंचिंग प्रकरणी (Palghar Sadhu Mob Lynching) महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारने (Shinde Govt on Palghar Sadhu mob lynching) मोठा निर्णय घेतला आहे. पालघरमधील साधूंच्या हत्येचा तपास (Palghar Sadhu Massacre CBI Investigation) केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) करण्याचे शिंदे सरकारने मान्य केले आहे.

Palghar Sadhu Murder Case
Palghar Sadhu Murder Case

मुंबई: २०२० मध्ये महाराष्ट्रातील पालघरमध्ये दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरला लोकांच्या संतप्त जमावाने बेदम मारहाण केली (Sadhu Beating and Killing Palghar) होती. त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकार कायदा व सुव्यवस्थेबाबत भाजप आणि संतांच्या निशाण्यावर आले होते. आता या प्रकरणी एक मोठे अपडेट समोर आले आहे. पालघरमधील साधूंच्या मॉब लिंचिंग प्रकरणी (Palghar Sadhu Mob Lynching) महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारने (Shinde Govt on Palghar Sadhu mob lynching) मोठा निर्णय घेतला आहे. पालघरमधील साधूंच्या हत्येचा तपास (Palghar Sadhu Massacre CBI Investigation) केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) करण्याचे शिंदे सरकारने मान्य केले आहे.

पालघर साधू हत्याकांडावर बोलताना त्यांचे नातेवाईक


सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल- निलेश तेलगडे हा साधूंच्या गाडीचा चालक होता. तो कांदिवलीहून सुरतला जाण्याच्या तयारीत होता. त्यानंतर नीलेश तेलगडेने दोन्ही साधूंना इको कारमध्ये बसवून त्याच पालघर जिल्ह्यातील सुरतला जाण्याची तयारी केली. हे साधू पालघरमध्ये आल्यावर काही लोकांनी चोर समजून दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरला मारहाण करून त्याचा खून केला. आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. यामध्ये राज्य सरकारने साधू हत्याकांड प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यास हरकत नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. पालघर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे.


मृतक निलेशच्या आप्तस्वकीयांचे मत- नीलेश तेलगडे यांच्या पत्नीने सांगितले की, महाराष्ट्र सरकारने आम्हाला मदत केली नाही. त्यानंतर नवीन सरकार आले. आता माझ्या पतीला न्याय मिळेल, माझ्या पतीची सीबीआय चौकशी करेल, हत्या कशी झाली यामागचे रहस्य काय? याचा उलगडा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. नीलेशच्या आईच्या म्हणण्याप्रमाणे, आता माझ्या मुलाला न्याय मिळेल. माझी सून आणि माझे दोन नातेवाईक एकत्र राहतात. माझ्या मुलाची निर्घृण हत्या झाली. माझा मुलगा वेदनांनी मरण पावला. मला आशा आहे की, सीबीआय चौकशीतून माझ्या मुलाला न्याय मिळेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.