ETV Bharat / city

गेल्या 3 महिन्यात केवळ 9 टक्के सायबर गुन्ह्यांची उकल

author img

By

Published : Apr 17, 2021, 3:13 PM IST

Updated : Apr 17, 2021, 4:23 PM IST

देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात कोरोना संक्रमणामुळे डिजिटल व्यवहार वाढलेले असून या माध्यमातून सायबर गुन्हेगारीचे प्रमाणही वाढलेले आहे. मात्र, या सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या प्रकरणात आरोपींना अटक होण्याचे प्रमाण मात्र खूपच कमी आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाच्या कामगिरीवरून दिसून येत आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात कोरोना संक्रमणामुळे डिजिटल व्यवहार वाढलेले असून या माध्यमातून सायबर गुन्हेगारीचे प्रमाणही वाढलेले आहे. मात्र, या सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या प्रकरणात आरोपींना अटक होण्याचे प्रमाण मात्र खूपच कमी आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाच्या कामगिरीवरून दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यात मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडे दाखल करण्यात आलेल्या एकूण गुन्ह्यांमध्ये केवळ 9 टक्के पोलिसांना तपास पूर्ण करता आला आहे.

गेल्या 3 महिन्यात केवळ 9 टक्के सायबर गुन्ह्यांची उकल
  • सायबर गुन्ह्यांच्या 9 टक्के तपास

जानेवारी, 2021 ते मार्च, 2021 या तीन महिन्याच्या काळात मुंबई शहरात तब्बल 639 सायबर गुन्हे घडले आहेत. मात्र, 639 सायबर गुन्हे घडल्यानंतरही याचा तपास होत केवळ 58 प्रकरणात पोलिसांनी तपास पूर्ण केला आहे.

  • विविध सायबर गुन्हे व त्यांचा तपास
  1. संगणकाच्या सोर्स कोडबद्दल छेडछाड करण्याच्या संदर्भात मुंबईत गेल्या 3 महिन्यांत 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मात्र, यात एकाही प्रकरणाचा तपास पोलिसांनी अद्याप पूर्ण केलेला नाही.
  2. संगणक कार्यप्रणालीवर सायबर हल्ला करण्याच्या संदर्भात एकही गुन्हा गेल्या तीन महिन्यात नोंदवण्यात आलेला नाही. इंटरनेट फिशिंग, नायजेरियन फ्रॉडच्या संदर्भात गेल्या तीन महिन्यात 4 गुन्हे नोंदविण्यात आले असून यात केवळ 2 गुन्ह्यांचा तपास पोलिसांना लावता आला आहे.
  3. अश्लील ई-मेल, एसएमएस, एमएमएस पाठवण्याच्या संदर्भात मुंबई सायबर पोलिसांकडे 67 गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत ज्यात केवळ 25 गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी केला आहे.
  4. सोशल माध्यमांवर बनावट प्रोफाईल बनवून बदनामी करण्याच्या संदर्भात 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून यात 3 प्रकरणाचा तपास पोलिसांना पूर्ण करता आलेला आहे.
  5. क्रेडिट कार्ड फसवणुकीच्या संदर्भात सर्वाधिक 134 गुन्हे दाखल करण्यात आले असता यात केवळ 5 गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी पूर्ण केला आहे.

सायबर गुन्ह्यांच्या इतर प्रकरणांमध्ये पोलिसांनी 422 गुन्ह्यांची नोंद केली असून यामध्ये 23 गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी पूर्ण करत आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचा - ईटीव्ही इम्पॅक्ट: अनावश्यक लोकल प्रवास करणार्‍यांवर कारवाई; रेल्वे स्थानकांवर कडक पोलीस बंदोबस्त

Last Updated :Apr 17, 2021, 4:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.